शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७१० इमारतींवर टांगती तलवार, पुन्हा ‘साईराज’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:13 IST

ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.

अजित मांडके ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. यामुळे किसनगर भागातील दाटीवाटीने वसलेल्या तब्बल ७१० इमारती या धोकादायकच्या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीमधील हजारो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन मागील कित्येक वर्ष वास्तव्य करीत आहेत.विजय निवास इमारतीच्या बाबतीत विचार केल्यास या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील घराचा स्लॅब हा दुसºया मजल्यावर पडला आणि यात एकाचा मृत्यू झाला. प्रथम दर्शनी ही इमारत राहण्यास योग्य वाटावी म्हणून अंतर्गत डागडुजी बरोबर ओव्हरलोड केल्याचे बोलले जात आहे. परंतु, आता या भागातील सर्व अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसे पाहिल्यास संपूर्ण किसनगर भाग हा अनधिकृत इमारतींचा भाग म्हणून ओळखला जातो. वागळे पट्टा हा पूर्वी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे दुरवरून येथे कामाला चाकरमानी येत होते. त्यांचे वास्तव्यच या भागात करून देण्यासाठी एकामागून एक इमारतींचे जाळे येथे उभारण्यात आले. त्यातून १९९० -९१ च्या दशकात किसननगर आणि शांतीनगरचा उदय झाला. याच भागात दाटीवाटीने इमारती उभारल्या गेल्या. राजकीय मंडळींनी, काही छोट्या मोठ्या कंत्राटदारांनी एकेक इमारत अवघ्या एक ते दोन महिन्यात उभ्या केल्या. विशेष म्हणजे यासाठी चांगल्या सिमेंटऐवजी सागोळी नावाच्या सिमेंटचा वापर केल्याचेही बोलले जाते. या सिमेंटचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे आता या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पालिकेच्या काही अधिकाºयांनी, स्थानिक राजकीय मंडळींनी याच अनधिकृत इमारतींच्या माध्यमातून आपले चांगभले केले. त्याचे भोग रहिवाशांना भोगावे लागत आहेत.वागळे भागातील किसननगर भागात असलेल्या आणि गटारावरच उभारण्यात आलेली साईराज ही इमारत ७ नोव्हेंबर १९९८ च्या दिवशी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला, तर १४ जण जखमी झाले. ही घटना घडल्यानंतरही या भागात अनधिकृत इमारतींचे जाळे मात्र कमी झाले नाही. आजही येथे १५०० हून अधिक अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. यापूर्वी एक हजाराहून अधिक इमारती धोकादायकच्या यादीत होत्या. आता त्यांची संख्या ७१० च्या घरात आहे. पालिकेकडून कारवाईची नोटीस आली की तात्पुरती डागडुजी आणि रंगरंगोटी करून इमारत राहण्यास योग्य असल्याचे भासवले जाते. परंतु, रहिवाशांच्या लक्षात येत नाही की, आपण साक्षात मृत्यू अंगावर घेऊन झोपत आहोत. पालिकादेखील याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. एवढ्या दाटीवाटीने या इमारती उभारण्यात आल्या आहेत की, भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर साधी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन विभागाची गाडीदेखील जाणे दुरापास्त होणार आहे.।दाटीवाटीने वसल्या आहेत इमारतीकिसननगरमध्ये पायाखाली पाण्याच्या लाईनचे जाळे आहे. ठिकठिकाणी खड्डे खणण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच या इमारतींचा पाया हा कच्चा असल्याने पुन्हा अशा प्रकारे खड्डे खोदले जात असल्याने त्याचा त्रासदेखील या इमारतींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवा, पाणी, किंवा साधे सूर्याचे दर्शनदेखील येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर आल्याशिवाय होत नाही. इतक्या दाटीवाटीने या इमारती वसल्या आहेत. बहुसंख्य इमारती ३० ते ३५ वर्षे जुन्या असल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक इमारती जीर्ण आहेत. असे असतांनाही सामान्य माणूस तेथे जीव धोक्यात घालून राहत आहे. इमारत रिकामी केली तर बेघर होण्याची भिती असल्याने रहिवासी घर सोडत नाहीत. पालिकेकडून दरवर्षी येथील इमारतींना नोटिसा बजावल्या जातात. त्यानंतर स्ट्रक्चरल आॅडिटही करण्याची घोषणा होते. परंतु, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. क्लस्टरसाठी (समूहविकास) पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अद्यापही योजनेसाठी कालावधी जाणार आहे. पहिल्या टप्यात वागळे पटट््यातील किसनगर भागाचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या भागाचा विकास करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात क्लस्टरचे काम केव्हा सुरू होणार हे पालिकेलादेखील सांगणे शक्य नाही.

टॅग्स :thaneठाणे