शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:21 AM

खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते.

ठाणे : खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील ३२ हजार ६३ शेतकºयांना १६० कोटी १२ लाख ३९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. या शेतकºयांनी त्यांच्या २९ हजार ७८३.०५ हेक्टर शेतीवरील पिकांसाठी हे अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे. नऊ दिवसांच्या शेतकरी मेळाव्याद्वारे बहुतांशी शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले.आतापर्यंत पीक कर्ज घेतलेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ६८५ शेतकºयांनी १६ हजार ६७३.९५ हेक्टर शेतावरील पिकांवर ८९ कोटी सात लाख ४६ हजारांचे पीक कर्ज घेतले. यामध्ये नियमित कर्ज भरणाºया ११ हजार ४९३ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांनी ५२ कोटी ९६ लाखांच्या कर्जाचा लाभ घेतला. या शेतकºयांना टीडीसीसी बँकेने त्यांच्या नऊ हजार ६५६.१५ हेक्टरवरील पिकांवर कर्ज दिले आहे. कर्जमाफी झालेले, कर्ज सवलत दिलेले आणि प्रोत्साहनपर कर्जलाभ मिळवलेल्यांमध्ये आठ हजार १९२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना ३६ कोटी ११ लाखांचा कर्जलाभ झाला आहे.या पीक कर्जाचा सर्वाधिक शेतकºयांना लाभ घेता यावा, यासाठी टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्या शिष्टमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यांत नऊ दिवस शेतकरी मेळावे घेऊन जागृती केली. या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्यात ४५ कोटी ८५ लाख कर्जवाटप केल्याचे आढळून आले. सुमारे साडेतीन हजार शेतकºयांना या नऊ दिवसांच्या मेळाव्यादरम्यान पीक कर्जाचा लाभ दिल्याचे निदर्शनास आले. पालघर जिल्ह्यात मेळाव्यापूर्वी सुमारे आठ हजार ३१७ शेतकºयांना ५३ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप केले होते.यामध्ये नियमित कर्ज भरणारे सात हजार ३३४ शेतकरी असून त्यांना ४२ कोटी १७ लाखांच्या पीक कर्जाचा लाभ झाला.>६७ लाखांची इतर कर्जेठाणे जिल्ह्यात वाटप केलेल्या ८९ कोटींप्रमाणेच पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ कोटी चार लाख रुपये पीक कर्ज १२ हजार ३७८ शेतकºयांना वाटप केले आहे. याशिवाय, ८८ शेतकºयांना ६७ लाख ९४ हजारांची कर्ज सवलत दिल्याचे टीडीसीसी बँकेने स्पष्ट केले.