शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

राष्ट्रवादीचे ७० टक्के नगरसेवक शिवसेना प्रवेशासाठी रांगेत उभे

By admin | Updated: January 26, 2017 03:15 IST

बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश

ठाणे : बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि महापौर संजय मोरे यांनी केला. शिवसेनेच्या विकासाच्या झपाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सैरभैर झाल्याचे सांगून त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन ते बेलगाम आरोप करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, शिवसेनेवर वाट्टेल ते आरोप करण्याआधी ठाण्याच्या विकासकामांमध्ये अडथळे आणायचे पाप कोणी केले, त्याचे उत्तर आव्हाड यांनी जनतेला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला कचरा, डम्पिंग, पाणी, धरण आदी मुद्यावरून धारेवर धरले असताना आता शिवसेनेनेही त्यांना आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. घनकचरा व्यवस्थापन, क्लस्टर डेव्हलपमेंट, धरण, मेट्रो अशा प्रत्येक उपक्र मात राजकारण करून मोडता घालण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणी केले, असा सवाल त्यांनी या वेळी केला. डायघर येथे प्रकल्पाचा पूर्ण आराखडा शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पालिकेने तयार केला होता. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न होणारा हा प्रकल्प होता. या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे काम राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्याने केले, याचे उत्तर आधी आव्हाड यांनी द्यावे, असेही म्हस्के म्हणाले. धरणांच्या बांधकामातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीच्या किती मंत्र्यांची चौकशी सुरू आहे, याचाही जाब त्यांनी द्यावा. ज्या शाई आणि काळू धरणाच्या नावाने आज आव्हाड खडे फोडत आहेत, त्या धरणांची कामे कुठल्याही मंजुऱ्या न घेता राष्ट्रवादीच्या जलसंपदामंत्र्यांनी कोणाचे भले करण्यासाठी सुरू केली, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. केवळ कंत्राटदारांकडून मलिदा खायला मिळावा, यासाठीच नियमबाह्य पद्धतीने या धरणांची कामे सुरू केल्यामुळे ही कामे आज न्यायालयीन लढाईत सापडली असल्याचे ते म्हणाले.रेतीबंदर चौपाटीचे श्रेय घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ हास्यास्पदच नसून केविलवाणा आहे, अशी टीका महापौर संजय मोरे यांनी केली. त्यांना खरोखरच इच्छाशक्ती असती तर ५ वर्षांत अशा कितीतरी चौपाट्या ठाण्याच्या खाडीकिनारी करता आल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यात आज मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ठाण्यात मेट्रो व्यवहार्य नाही, असे सांगितले होते. तेव्हा आव्हाडांनी आपल्या सरकारला मेट्रोची गरज का पटवून दिली नाही.