शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

राष्ट्रवादीचे ७० टक्के नगरसेवक शिवसेना प्रवेशासाठी रांगेत उभे

By admin | Updated: January 26, 2017 03:15 IST

बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश

ठाणे : बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि महापौर संजय मोरे यांनी केला. शिवसेनेच्या विकासाच्या झपाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सैरभैर झाल्याचे सांगून त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन ते बेलगाम आरोप करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, शिवसेनेवर वाट्टेल ते आरोप करण्याआधी ठाण्याच्या विकासकामांमध्ये अडथळे आणायचे पाप कोणी केले, त्याचे उत्तर आव्हाड यांनी जनतेला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला कचरा, डम्पिंग, पाणी, धरण आदी मुद्यावरून धारेवर धरले असताना आता शिवसेनेनेही त्यांना आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. घनकचरा व्यवस्थापन, क्लस्टर डेव्हलपमेंट, धरण, मेट्रो अशा प्रत्येक उपक्र मात राजकारण करून मोडता घालण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणी केले, असा सवाल त्यांनी या वेळी केला. डायघर येथे प्रकल्पाचा पूर्ण आराखडा शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पालिकेने तयार केला होता. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न होणारा हा प्रकल्प होता. या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे काम राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्याने केले, याचे उत्तर आधी आव्हाड यांनी द्यावे, असेही म्हस्के म्हणाले. धरणांच्या बांधकामातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीच्या किती मंत्र्यांची चौकशी सुरू आहे, याचाही जाब त्यांनी द्यावा. ज्या शाई आणि काळू धरणाच्या नावाने आज आव्हाड खडे फोडत आहेत, त्या धरणांची कामे कुठल्याही मंजुऱ्या न घेता राष्ट्रवादीच्या जलसंपदामंत्र्यांनी कोणाचे भले करण्यासाठी सुरू केली, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. केवळ कंत्राटदारांकडून मलिदा खायला मिळावा, यासाठीच नियमबाह्य पद्धतीने या धरणांची कामे सुरू केल्यामुळे ही कामे आज न्यायालयीन लढाईत सापडली असल्याचे ते म्हणाले.रेतीबंदर चौपाटीचे श्रेय घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ हास्यास्पदच नसून केविलवाणा आहे, अशी टीका महापौर संजय मोरे यांनी केली. त्यांना खरोखरच इच्छाशक्ती असती तर ५ वर्षांत अशा कितीतरी चौपाट्या ठाण्याच्या खाडीकिनारी करता आल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यात आज मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ठाण्यात मेट्रो व्यवहार्य नाही, असे सांगितले होते. तेव्हा आव्हाडांनी आपल्या सरकारला मेट्रोची गरज का पटवून दिली नाही.