शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

निवडणूक काळात बदली झालेल्या ७ पोलीस अधिकाऱ्यांची मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात घर वापसी

By धीरज परब | Updated: January 1, 2025 12:43 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकाऱ्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या झाल्या होत्या.

मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकाऱ्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी आता ७ अधिकाऱ्यांची पुन्हा आयुक्तालयात नियुक्ती केली गेली आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणुक आयोगाने ३१ जुलै आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी दिले होते.  १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता सुरु झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने बदलीस पात्र पोलीस अधिकाऱ्यांची यादी पोलीस महासंचालकांना सादर केली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. बदल्या केल्याने अनेक अधिकारी नाराज होते. 

 नोव्हेंबर रोजी मुंबई व अन्य भागातील ३६ अधिकाऱ्यांची नियुक्ती पोलीस आयुक्तालयात केली गेली होती. उपायुक्त मुख्यालय यांच्या आदेशात नव्याने हजर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी तुळींज वगळता एकही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वा प्रभारी म्हणून नियुक्तीच केली गेली नव्हती.  सदर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या तात्पुरत्या असल्याचे नमूद केले होते. 

त्यामुळे नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणुकीनंतर पुन्हा अंतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकमतने देखील तसे वृत्त दिले होते. आयुक्तालयातून मुंबई आदी भागात बदली झालेल्या पैकी काही पोलीस निरीक्षकांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. शिवाय काही अधिकाऱ्यांनी आपणास पुन्हा मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयात नियुक्ती करावी असे विनंती अर्ज देखील केले होते. 

अखेर ३१ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने ४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयातून मुंबईत बदली झालेले संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ पोलीस निरीक्षकांची पुन्हा बदली करून घर वापसी केली गेली आहे. 

पुन्हा आयुक्तालयात घर वापसी झाल्याने हे अधिकारी खुश झाले असून त्यांना पुन्हा आधी कार्यरत असलेली पोलीस ठाणी मिळतील अशी शक्यता आहे. त्यातही बदली होऊन पुन्हा आलेल्या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या वरिष्ठते नुसार त्या त्या पोलीस ठाण्यात नेमल्यास सध्या प्रभारी पद सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक यांच्या हाताखाली काम करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस