शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

By सुरेश लोखंडे | Updated: July 25, 2023 17:01 IST

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे

ठाणे : जिल्ह्याचे विभाजन हाेऊन पालघर जिल्ह्याची निमिर्ती झाली आहे. तेव्हापासून पालघरमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाचे ७८ कर्मचारी अडकवून ठेवलेले आहेत. त्यापैकी आता ७१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी ६३ कर्मचारी हजर झाल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी लाेकमतला सांगितले.

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे. त्यापैकी ज्या कर्मचार्यांना ठाणे जिल्ह्यात यायचे आहे, अशांचा सहमतीदर्शक विकल्प त्याच वेळी जिल्हा परिषदेने लिहून घेतला हाेता. आता पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचार्यांची रितसर भरती करून रिक्त जागा भरल्या जात आहे. त्यानुसार विकल्प घेतलेले कर्मचार्यांचा बदल्या ठाणे जिल्हा परिषदेत केल्या जात आहे. आराेग्य विभागाच्या या ७८ पैकी ७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी ६३ कर्मचारी ठाणे जिल्हा परिषदेच्या कामकाजात सक्रीयही झाले. उर्वरित साज कर्मचारी पालघरमध्ये आहेत.

पालघरमधून ठाणे जिल्ह्यात आलेल्या या कर्मचार्यांमध्ये सर्वाधिक ३२ आराेग्य सेवक असून त्यापैकी ३१ हजर झाले. तर २१ महिला आराेग्य सेविकांपैकी १९ हजर झाले आहेत. याशिवाय बदली झालेल्या नऊ औषध निर्माण् अधिकार्यांपैकी सहा जण हजर झाले आहेत. तर पाच प्रयाेग शाळा तंत्रज्ञांपैकी चार कामावर सक्रीय झाले. चार शिफाई कामगारांपैकी तीन कामगार हजर हाेऊन कामाला लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कमी कर्मचार्यांमध्ये गांवखेड्यांची काळजी घेणार्या आराेग्य विभागाला आता अधीकचे मनुष्यबळ मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणे