शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

धरणांच्या सुरक्षिततेसाठी 624 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 05:55 IST

राज्यातील कोयना, जायकवाडी, भंडारदरा अशा एकूण १२ धरणांचा समावेश

- नारायण जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यातील बहुसंख्य धरणे बांधून बराच कालावधी लोटल्याने अनेकांचे बांधकाम धोकादायक झालेले आहे. शिवाय अलिकडच्या काळात देशविघातक कारवायांमध्ये त्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने राज्यातील १२ धरणांची सुरक्षा आणि परिचलन व्यवस्था बळकट करून त्यांच्या कामात सातत्य आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ६२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या १२ धरणांमध्ये ठाणे जिल्ह्यातील राजधानी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन सर्वात मोठ्या भातसा धरणासह मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरा, मांजरा, साताऱ्याचे कोयना, पुण्याचे डिंभे, अप्पर वर्धा, वान, ज्ञानगंगा, सपान, कण्हेर, लोअर वेण्णा या धरणांचा समावेश आहे.धरण सुधारणा व पुनर्स्थापना टप्पा क्रमांक २ हा केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्प आहे. देशातील निवडक आणि प्रमुख धरणांची सुरक्षा व्यवस्था, परिचलन व्यवस्था, देखभाल व्यवस्थेची बळकटी करणे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. 

या प्रकल्पात महाराष्ट्रही सहभागी झाला असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील या १२ धरणांची सुरक्षा आणि परिचलन व्यवस्था आता बळकट होणार आहे. या सर्व १२ धरणांच्या निविदा प्रक्रियेस मान्यता देऊन ११४ कोटींपर्यंतच्या निविदा, कर्जाची करारनामे, कागदपत्रे साक्षांकित होण्यापूर्वी कार्यारंभ आदेश देण्यासही जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.

जागतिक बँक देणार ९६५.६५ कोटीजागतिक बँकेसोबत गेल्या वर्षी झालेल्या वाटाघाटी बैठकीत धरण सुधारणा व पुनर्स्थापना टप्पा क्रमांक २ साठी एकूण प्रकल्पाच्या ७० टक्के अर्थात १३१.३१ दशलक्ष अमेरिकन डॉलर अर्थात ९६५.६५ कोटींची तरतूद केली आहे; मात्र आता नव्या नियमानुसार या कामांसाठी, निविदांसाठी राज्य शासनाच्या संस्थात्मक लवादाने निश्चित केलेल्या तरतुदींऐवजी जागतिक बँकेने निश्चित केलेल्या तरतुदींचा समावेश करण्याचे बंधन आहे.

धरणनिहाय असा होणार खर्चभातसा - २००.६६ कोटी, डिंभे - ७२.९२ कोटी, भंडारदरा - ७३.७९ कोटी, वान -१०.०६ कोटी, ज्ञानगंगा - ५.५० कोटी, सपान - १५.१० कोटी, कोयना - २२.७० कोटी, कण्हेर - १०.९१ कोटी, अप्पर वर्धा - १०.४९ कोटी, मांजरा - ५०.६१ कोटी, जायकवाडी - ८८.५७ कोटी, लोअर वेण्णा - ५९.४४ कोटी अशा ६२०.६५ कोटीसह संस्था बळकटीकरण अडीच कोटी आणि प्रकल्प सल्लागार ७५ लाख असे एकूण ६२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.