शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:23 IST

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ । सेनेवर कुरघोडीचा प्रयत्न

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखणार, अशी शक्यता वाटत होती. मात्र, भाजपनेच आव्हाडांना घेरण्यासाठी गनिमी कावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ६०० हून अधिक स्वयंसेवक कळवा, मुंब्रा पिंजून काढत असून स्थानिकांसोबत गुप्त बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ६७ हजार ४५५ मते मिळाली.शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. राष्टÑवादीचे बाबाजी पाटील यांना या मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली. परंतु, विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, संघ परिवार व भाजप नेतृत्वावर टीकेचे प्रहार करणाऱ्या आव्हाडांना त्यांच्याच घरात घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती आहे. रा.स्व. संघ, भाजपविरोधात कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह, हार्दिक पटेल यांनी मोर्चा उघडला होता. परंतु, त्या सर्वांचे आवाज भाजपने लोकसभा निवडणुकीत बंद करून टाकले. राज्यातील इतर कोणताही नेता हिंदुत्वाविरोधात थेट आवाज उठवत नाही, परंतु आव्हाड हे नेहमी भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात बोलत असल्याने आता त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने उचल खाल्ली आहे.सेनेच्या मदतीने कब्जा करण्याचा मनसुबाभाजप आणि स्वयंसेवक संघाची मंडळी या भागात गुप्त बैठका घेत असून आव्हाड यांचे कच्चे दुवे हेरत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेला हाताशी घेऊन या मतदारसंघावर कब्जा करण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. एमआयएमचा उमेदवार उभा करून मुस्लिम मतांचे विभाजन करणे शक्य आहे का, याचा आढावा स्वयंसेवक घेत आहेत. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का, याबाबत चित्र स्पष्ट नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे