शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

किल्ले संवर्धनासाठी ६०० कोटी , मोदी सरकारकडून लोकहिताची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:50 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. शनिवारी पूर्वेकडील नूतन विद्यामंदिर शाळेत भरवण्यात आलेल्या दोनदिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.भाजपाचे कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून शस्त्रसंग्रह करणाºया सुनील कदम यांचे या वेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी विशेष कौतुक केले. शिवाजी महाराज हे कल्याणमध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आरमार आणि किल्ले यासाठी महाराज नेहमी आग्रही होते. त्यांनी केलेली प्रत्येक लढाई ही महत्त्वाची होती. त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध शस्त्रांचा वापर करून लढाई जिंकली आहे, असे सांगताना चव्हाण यांनी हा इतिहास समजावा, म्हणून रायगडासह अन्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाने ज्याप्रमाणे काम केले, त्याप्रमाणे सध्याचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य देशातील नागरिकांना अनुभवाला येईल, असा दावा चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. या वेळी आयोजक संजय मोरे, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, वैभव गायकवाड, हेमलता पावशे, सुमित्रा नायडू, कमल पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शाळकरी मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

टॅग्स :Fortगड