शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत नेण्याची गरज; एसी लोकलचे भाडे कमी करा- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 11:46 IST

साध्या लोकल वाढवा

डोंबिवली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी रेल्वे संबंधित अनुदान मागणी संदर्भातील चर्चेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहभाग घेत आपल्या मतदारसंघातील विकासकामे, उपनगरी रेल्वे सेवा व प्रवाशांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत न्यावी, एसी लोकलच्या भाड्यात कपात करा, साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या.

दिवा-ठाणे दरम्यानची पाचवी-सहावी मार्गिका नुकतीच सुरू झाली आहे. सध्या या मार्गांवरून एसी लोकल चालविण्यात येत आहेत. १ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान एसी लोकलने ६५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. हे प्रमाण या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ५० टक्क्यांहून खूप कमी आहे. एसी लोकलचे भाडे सेकंड क्लासच्या रेल्वे प्रवासाच्या १० पटींने अधिक आहे, तर फर्स्ट क्लासपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे एसी लोकलचे भाडे कमी करावे. तसेच साध्या लोकलच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत असलेल्या या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे जमिनींवर बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेने या जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु, हे रहिवासी ४० ते ५० वर्षे व त्याहूनही अधिक काळ तेथे राहत असल्याने त्यांचे पुर्नवसन करावे. या संदर्भात नुकतीच मुंबईत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी एमएमआरए क्षेत्रातील खासदार व आमदारांनी भेट घेतली. 

यावेळी केंद्र, राज्य सरकार, रेल्वे आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रितपणे योजना राबवून या नागरिकांचे पुनर्वसन करावे. तोपर्यंत या रहिवाशांना नोटिसा पाठवू नयेत, ही मागणी दानवे यांनी मान्य केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा रेल्वेने या रहिवाशांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे पुनर्वसनाचा मार्ग सुटत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेthaneठाणे