शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

५७८ शाळा शंभर नंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून मुंबई विभागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून मुंबई विभागात ठाणे जिल्हा चौथ्या स्थानी आहे. जिल्ह्यातील एकदोन नव्हे तर तब्बल ५७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सर्वाधिक आहेत. ठाण्यातील एकूण २६१ पैकी १४१ म्हणजे अर्ध्याहून जास्त शाळांनी शंभर नंबरी यश मिळवले आहे.जिल्ह्यातील १०० टक्के यश मिळवलेल्या शाळांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ११४ शाळा आहेत. नवी मुंबईतील ७६, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रतील ६८, अंबरनाथ-बदलापुरातील ५३, भिवंडी तालुक्यातील ४३, शहापुरातील २६, उल्हासनगरमधील २४, कल्याण ग्रामीण तालुक्यातील १८, तर मुरबाडमधील १५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे निकालही नव्वदीपार लागले आहेत. जिल्ह्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९७.९५ टक्के, तर भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९३.८७ टक्के इतका लागला आहे.यंदाचा दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या निकालांतील सर्वोच्च निकाल आहे. गेल्या १० वर्षांत आणि त्यामागील निकाल पाहता हा भरघोस निकाल आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जे उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश न होता त्यांच्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने मार्गदर्शन, समुपदेशन व फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा परिषद