शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

जिल्ह्यात सापाच्या ५७ जाती, चार साप विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रमाणही आता वाढताना दिसणार आहे. साप चावण्याचे प्रकारही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रमाणही आता वाढताना दिसणार आहे. साप चावण्याचे प्रकारही पावसाळ्यात जास्त असते; परंतु प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही. ठाणे जिल्ह्याचा विचार केला, तर या जिल्ह्यात सापाच्या तब्बल ५७ जाती आढळून येत आहेत; परंतु त्यातील अवघे चार साप हे विषारी असून, उर्वरित निमविषारी आणि बिनविषारी आहेत. मात्र, यातील कोणताही साप माणसाला चावला, तर तो विषारी आहे की बिनविषारी आहे, याची माहिती नसल्याने तो घाबरल्याने त्याला अधिक त्रास होत असल्याचेही दिसून आले आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांत नाग, घोणस, मन्यार, फुरसा हे चार सर्वांत विषारी आहेत.

खाडीकिनारी अथवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात परिसरात झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे, साप नागरी वस्त्यांमध्ये शिरताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ५७ प्रकारचे साप असून, त्यापैकी घोणस, मण्यार, फुरसे, नाग, चापड्यासारखे विषारी साप असून, उर्वरित निमविषारी तर काही बिनविषारी साप आहेत. साप हे साधारण २८ ते ३४ अंश तापमानात वावरत असताना आता हे तापमान वाढले की, हे साप गारव्यासाठी सोसायटीतील झाडीझुडपात येतात, तर कधी उंदीर, घूस या प्राण्यांचा मागोवा घेत वस्तीत येतात. त्यात पावसाळा सुरू झाला की, ते बाहेर येण्याचे प्रमाण वाढते. त्यातूनच सर्पदंश होऊन अनेकांना त्रास होताे. प्रत्येक साप हा विषारी असतोच, असे नाही, तर अनेक साप हे बिनविषारी आणि निमविषारीदेखील असल्याचे सर्पमित्र सांगतात. त्यांच्यापासून भीती नसली तरी त्याचे ज्ञान असणे गरजेचे असते. ते असेल तर सापाची भीती कमी होण्यास मदत होते.

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

नाग- ठाणे जिल्ह्यात आढळणारा हा विषारी साप आहे. याचा रंग हा पिवळा असून, डोक्याच्या पाठीमागे काळसर आकडा असतो. त्याच्या जवळ गेल्यास फणा काढून इशारा देतो.

मन्यार- हा निषाचर असल्याने मन्यार हा रात्री बाहेर पडणारा साप आहे. त्याच्या मानेच्या मागे चार बोटे ठेवून आडवे पट्टे असतात. ते शेपटीपर्यंत असतात.

घोणस- घोणसच्या अंगावर रुद्राक्षांच्या माळा असतात, तसेच ती कूकरच्या शिटीसारखा आवाज करते.

फुरसा- हाताची वीत होईल एवढा छोटा आकार या सापाचा असतो. त्याच्या डोक्यावर बाणाकृती निशाणी असते. त्यावरून तो ओळखता येतो; परंतु त्या तुलनेत अधिक विषारी असणारा साप आहे.

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

वाळा, खापरखवल्या, अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, तस्कर, कवड्या, नानेटी, कुकरी, धामण, धूळनागीण, चित्नांग नायकूळ, गवत्या, रुखई, काळतोंड्या, पानधिवड आदी.

निमविषारी साप- श्वानमुखी, झिलाण, मांजऱ्या, रेतीसर्प, हरणटोळ.

साप आढळला तर...

एखाद्या परिसरात साप आढळला, तर तो कोणत्या जातीचा आहे, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना साधारणपणे त्याची माहिती नसते. त्यामुळे त्यांना हा साप कुठे आहे, कुठे जाण्याची शक्यता आहे. झाडावर आहे, घरात आहे, याची माहिती ठेवावी. त्यानंतर तत्काळ सर्पमित्र किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवावे, तसेच एका माणसाने त्या सापावर लक्ष ठेवावे आणि दुसऱ्याने फोनद्वारे सर्पमित्राला संपर्क साधावा. त्यातही साप दिसल्यानंतर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घाबरून जाऊ नये.

साप चावला तर...

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साप चावल्यावर घाबरून जाण्याची काही गरज नाही. मानसिक आधार देणे गरजेचे. साप चावला, तर थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आता सांगितले जात आहे; परंतु यापूर्वी तो चावल्याच्या ठिकाणी पाणी ओतणे, पट्टी बांधणे, हात ठेवणे, क्रेब बॅण्डेज बांधणे हे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तत्काळ उपचारार्थ दाखल करावे.

........

साप चावल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे, हा महत्त्वाचा उपचार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, तसेच ज्याला तो चावला असेल त्यास मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यातून उपचारालादेखील प्रतिसाद मिळून सर्पदंश झालेली व्यक्ती लवकर बरी होऊ शकते.

(कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

ठाणे जिल्ह्यात ५७ प्रकारचे साप आढळतात. त्यात ४ साप हे विषारी आहेत; परंतु आता पावसाळ्यात बाहेर निघण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा वेळेस घाबरून न जाता, याची माहिती तत्काळ सर्पमित्राला देणो गरेजेचे आहे, तसेच एखाद्याला सर्प चावलाच, तर त्याच्यावर शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचारार्थ दाखल करावे.

(अनिल कुबल, सर्पमित्र, ठाणे)