शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भिवंडीतील ५५४ हेक्टर कांदळवन जमीन राखीव वने म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खाडीलगतच्या तब्बल ३१ गावातील खाडीकिनारी असलेली सुमारे ५५४ हेक्टर कांदळवनाची जमीन महसूल विभागाकडून राखीव वने ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खाडीलगतच्या तब्बल ३१ गावातील खाडीकिनारी असलेली सुमारे ५५४ हेक्टर कांदळवनाची जमीन महसूल विभागाकडून राखीव वने म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वनखात्याचे नाव नमूद केल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

शहरात सिमेंटची जंगले उभी राहत असताना पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच काही बांधकाम व्यावसायिकांकडून समुद्रासह खाडीक्षेत्रातील कांदळवनाची कत्तल करून अतिक्रमण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कांदळवनाची जमीन राखीव वने म्हणून जाहीर करून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनखात्यावर सोपविली आहे. भिवंडी तालुक्यातील मौजे आलिमघर, भरोडी, दिवे ( केवणी), दिवे अंजुर, गोवे, जुनांदू, काल्हेर, कशेळी खारबाव, पाये, पायगाव, पिंपळास, पिंपळघर, वडूनवघर, राजनोली, कांबे, सांगे, वेहळे, डुंगे, कारिवली, कोन, सारंगगाव, गाणे, काटई, मालोडी (खारबाव), सुरई, गुंदवली, केवणी, नांदकर, टेंभवली ही खाडीलगतची गावे आहेत. येथील कांदळवन असलेले क्षेत्राचे महसूल विभागाकडून मोजमाप करण्यात आले. त्यानुसार शासनाच्या दोन वेगवेगळ्या आदेशानुसार ४४१ - ६५- २७ हेक्टर व ११३ -१७-६४ हेक्टर असे एकूण ५५४ हेक्टर ८२ गुंठे ९१ वार एवढी जमीन राखीव वने म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या कांदळवनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन खात्याची असणार असल्याचे तहसीलदार अधिक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बेकायदा रेतीउपशामुळे धूप

भिवंडी तालुक्याच्या सीमेवरील खाडी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून, त्यास प्रतिबंध होण्यासाठी रेतीमाफियांविरोधात महसूल विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कांदळवनाचे संवर्धन व रक्षणाची जबाबदारी वनखात्याने गांभीर्याने पार पाडल्यास रेती उत्खनन व खाडी क्षेत्राची होणारी धूप रोखण्यात निश्चितच यश येऊ शकते.