शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

भिवंडीतील ५५४ हेक्टर कांदळवन जमीन राखीव वने म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खाडीलगतच्या तब्बल ३१ गावातील खाडीकिनारी असलेली सुमारे ५५४ हेक्टर कांदळवनाची जमीन महसूल विभागाकडून राखीव वने ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खाडीलगतच्या तब्बल ३१ गावातील खाडीकिनारी असलेली सुमारे ५५४ हेक्टर कांदळवनाची जमीन महसूल विभागाकडून राखीव वने म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वनखात्याचे नाव नमूद केल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

शहरात सिमेंटची जंगले उभी राहत असताना पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच काही बांधकाम व्यावसायिकांकडून समुद्रासह खाडीक्षेत्रातील कांदळवनाची कत्तल करून अतिक्रमण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कांदळवनाची जमीन राखीव वने म्हणून जाहीर करून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनखात्यावर सोपविली आहे. भिवंडी तालुक्यातील मौजे आलिमघर, भरोडी, दिवे ( केवणी), दिवे अंजुर, गोवे, जुनांदू, काल्हेर, कशेळी खारबाव, पाये, पायगाव, पिंपळास, पिंपळघर, वडूनवघर, राजनोली, कांबे, सांगे, वेहळे, डुंगे, कारिवली, कोन, सारंगगाव, गाणे, काटई, मालोडी (खारबाव), सुरई, गुंदवली, केवणी, नांदकर, टेंभवली ही खाडीलगतची गावे आहेत. येथील कांदळवन असलेले क्षेत्राचे महसूल विभागाकडून मोजमाप करण्यात आले. त्यानुसार शासनाच्या दोन वेगवेगळ्या आदेशानुसार ४४१ - ६५- २७ हेक्टर व ११३ -१७-६४ हेक्टर असे एकूण ५५४ हेक्टर ८२ गुंठे ९१ वार एवढी जमीन राखीव वने म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या कांदळवनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन खात्याची असणार असल्याचे तहसीलदार अधिक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बेकायदा रेतीउपशामुळे धूप

भिवंडी तालुक्याच्या सीमेवरील खाडी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून, त्यास प्रतिबंध होण्यासाठी रेतीमाफियांविरोधात महसूल विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कांदळवनाचे संवर्धन व रक्षणाची जबाबदारी वनखात्याने गांभीर्याने पार पाडल्यास रेती उत्खनन व खाडी क्षेत्राची होणारी धूप रोखण्यात निश्चितच यश येऊ शकते.