शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:01 IST

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती.

मुरबाड : तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांना रोजगाराचे साधन नसल्यामुळे ते जीवाची जोखीम पत्करून कोणतेही काम करत आहेत. झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा  (वय ५५) ही आदिवासी महिला पोटाची खळगी भरण्यासाठी ५० फूट उंच बेलाच्या काटेरी झाडावर चढून बेलाची पाने काढत आहे. ही पाने कल्याण, ठाणे आणि मुंबई या शहरांत विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. 

कष्टकरी आदिवासींना कायमचा रोजगार नसल्यामुळे रोजगारासाठी त्यांना घाटमाथ्यावर असलेल्या आळेफाटा, जुन्नर, पुणे, नाशिक, जळगाव, पालघर याठिकाणी भटकंती करावी लागते. या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती खुंटलेली आहे. 

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती. तेव्हा तिला एक बेलाचे झाड दिसले. ही पाने देवपूजेसाठी वापरली जात असल्यामुळे तिने ती टोपली भरून घरी आणली आणि दुसऱ्यादिवशी ती पाने मंदिराशेजारी जाऊन विकली. त्यातून मिळालेले पैसे तिने आपल्या वडिलांच्या हातात दिले.  

यानंतर हा तिचा कायमचाच रोजगार झाला. लग्न झाल्यानंतरही तिने हा व्यवसाय सुरू ठेवला. बांबूची ४० ते ५० फुटांची शिडी लावून ती बेलाची पाने काढते. तिचा पती शेतात काबाडकष्ट करत असताना ती पतीला आर्थिक हातभार लावत आहे.  त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरीत्या सुरू आहे.

वयाच्या पंधरा वर्षांपासून मी हे काम करत आहे. वडिलांनी गावातच माझे लग्न लावून दिले. मी लग्नानंतरही हे काम सोडले नाही. आता पती, दोन मुले व नातवंडे असा परिवार असून, हा व्यवसाय त्यांचा आधार बनला आहे. - कांताबाई सावरा

टॅग्स :thaneठाणे