शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:01 IST

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती.

मुरबाड : तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांना रोजगाराचे साधन नसल्यामुळे ते जीवाची जोखीम पत्करून कोणतेही काम करत आहेत. झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा  (वय ५५) ही आदिवासी महिला पोटाची खळगी भरण्यासाठी ५० फूट उंच बेलाच्या काटेरी झाडावर चढून बेलाची पाने काढत आहे. ही पाने कल्याण, ठाणे आणि मुंबई या शहरांत विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. 

कष्टकरी आदिवासींना कायमचा रोजगार नसल्यामुळे रोजगारासाठी त्यांना घाटमाथ्यावर असलेल्या आळेफाटा, जुन्नर, पुणे, नाशिक, जळगाव, पालघर याठिकाणी भटकंती करावी लागते. या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती खुंटलेली आहे. 

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती. तेव्हा तिला एक बेलाचे झाड दिसले. ही पाने देवपूजेसाठी वापरली जात असल्यामुळे तिने ती टोपली भरून घरी आणली आणि दुसऱ्यादिवशी ती पाने मंदिराशेजारी जाऊन विकली. त्यातून मिळालेले पैसे तिने आपल्या वडिलांच्या हातात दिले.  

यानंतर हा तिचा कायमचाच रोजगार झाला. लग्न झाल्यानंतरही तिने हा व्यवसाय सुरू ठेवला. बांबूची ४० ते ५० फुटांची शिडी लावून ती बेलाची पाने काढते. तिचा पती शेतात काबाडकष्ट करत असताना ती पतीला आर्थिक हातभार लावत आहे.  त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरीत्या सुरू आहे.

वयाच्या पंधरा वर्षांपासून मी हे काम करत आहे. वडिलांनी गावातच माझे लग्न लावून दिले. मी लग्नानंतरही हे काम सोडले नाही. आता पती, दोन मुले व नातवंडे असा परिवार असून, हा व्यवसाय त्यांचा आधार बनला आहे. - कांताबाई सावरा

टॅग्स :thaneठाणे