ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४७ रुग्ण रविवारी सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६० हजार ७२५ रुग्ण झाले असून सहा हजार २३८ मृत्यूची नोंद झाली आहे.
ठाणे शहरात १७७ रुग्ण सापडले आहेत. या शहरात ६१ हजार ७० रुग्ण नोंद झाले आहे. तर, एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३८० झाली. कल्याण - डोंबिवलीत १४७ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ६१ हजार ९८३ बाधीत असून एक हजार १८९ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरला ११ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७५१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३७१ झाली आहे. भिवंडीला ६ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ७५७ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २६ हजार ७८६ बाधितांसह ८०२ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ७०१ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ३२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ६८३ झाले असून एकही मृत्यू नाही. तर, मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १० रुग्णांचा शोध घेण्यात आला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ४०८ बाधीत झाले असून ५९२ जणांचा मृत्यू झालेला आहे.