शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By सदानंद नाईक | Updated: November 10, 2022 19:17 IST

अनुकंपा व वारसाहक्काची पदेही भरली

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेने पदोन्नतीने ५४, अनुकंपातत्वावर २० तर वारसाहक्क पद्धतीने ३६ पैकी २५ पदे भरल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच बारवी प्रकल्पग्रस्त ३४ पैकी २६ पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.

उल्हासनगर महापालिकेत वर्ग- ३ व ४ ची ६० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असून अधिकारी वर्गाची ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. दरम्यान पदोन्नती, वारसा हक्क व अनुकंपतत्वावर पदे भरण्याची मागणी कामगार संघटनेने महापालिकेकडे लावून धरली होती. वर्ग-४ मधून वर्ग-३ मध्ये लिपीक व मुकादम यापदी एकून ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच शैक्षणिक पात्रतानुसार २० पदे अनुकंपातत्वावर घेण्यात आली असून लाड व पागे समितीनुसार वारसहक्काने ३६ पैकी २५ जणांची नियुक्ती केली. तर इतर पदे तांत्रिक अडचणीमुळे भरण्यात आले नाही. १३ जणांच्या वारसांनी अध्याप अर्ज दाखल केला नाही. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. या नियुक्तीने कामगारांनी समाधान व्यक्त केले जात असतांना, कामगार नेते दिलीप थोरात यांनी मात्र पदोन्नती, वारसाहक्क, अनुकंपातत्त्वावरील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे केले.

 उल्हासनगर महापालिकेसह जिल्हयातील इतर महापालिकेला बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. बारवी धरण प्रकल्पग्रस्त नागरिकांना पाणी पुरवठा करण्याच्या प्रमाणात नोकरी देण्याचे आदेश शासनाचे आहेत. बारवी धरण प्रकल्पग्रस्ता पैकी ३४ जणांना महापालिकेत सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. ३४ पैकी ५ प्रकल्पग्रस्त अल्पवयीन तर एकाने कागदपत्र महापालिकेकडे जमा केली नाही. तसेच ३ जणांनी अटीशर्ती पूर्ण केल्या नाहीत व अनुभव नाही. इतर २५ प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याची माहितीही उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. प्रकल्पग्रस्त नागरिकांनाचा नोकरीचा मार्ग मोकळा झाल्याने, त्यांनी आनंद व्यक्त केला. महापालिकेचे उत्पन्न व खर्च बघता नवीन नोकर भरती करणे शक्य आहे. असे संकेत नाईकवाडे यांनी दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर