शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ५०० कोटीच्या आराखड्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 19:18 IST

ठाणे जिल्ह्यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे ५०० कोटी इतक्या भरीव आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

ठाणे - जिल्ह्यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे ५०० कोटी इतक्या भरीव आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना सर्व निधी विभाग प्रमुखांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खर्च करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याच्या व्हिजन २०३० चे सादरीकरण करण्यात आले. नियोजन भवनातील सभागृहात आज दुपारी ही बैठक पार पडली.

२०१८-१९ साठी ३०६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली याशिवाय आदिवासी उपयोजनेसाठी ९४ कोटी ५४ लाख, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी २६ कोटी १३ लाख , तसेच विशेष घटक योजनेसाठी ७० कोटी ७३ लाख अशा एकंदर ४९८ कोटी १२ लाख रुपयाच्या खर्चास आज मंजुरी मिळाली.  या निधीतून १५ कोटी ३४ लाख नाविन्यपूर्ण योजनांवर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. कृषी, ग्रामविकास,पाटबंधारे, सामाजिक सेवा हे कोअर सेक्टर म्हणजे गाभा क्षेत्र असून त्यासाठी एकंदर १६३.५९  कोटी तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ८१ कोटी ७९लाख निधी ठेवण्यात आला आहे.

आरोग्य यंत्रणा मजबूत करावीयावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले कि ठाणे सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्र बसविणे, तसेच जिल्ह्यातील ३३ आरोग्य केंद्रे अधिक अद्ययावत होण्याकडे प्रशासनाने लक्ष्य द्यावे. माळशेज, अंबरनाथ, टिटवाळा याठिकाणी अधिक पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात. रस्त्यांसाठीचा खर्च सुयोग्य पद्धतीने व्हावा म्हणून हा विषय बिगर गाभा क्षेत्रात न ठेवता गाभा क्षेत्रात आणण्यासंदर्भात ठरवा घेऊन तो मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात यावा असेही पालकमंत्री म्हणाले. पुढील वर्षीच्या खर्चाचे नियोजन एप्रिलपासून होईल याकडे लक्ष्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

माफियांवर कारवाई अधिक तीव्र कराठाणे जिल्ह्यात विशेषत: भिवंडी भागात काल्हेर, कशेळी या भागात काही ठिकाणी कांदळवाणाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत तसेच रेती माफिया ज्या ठिकाणी रेतीचा उपसा करीत आहेत त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने त्वरित  कारवाई करावी तसेच मोक्का किंवा एमपीडीए सारखे कायदे लावावेत असेही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी राज्यातील एमपीडीएची पहिली केस ठाणे जिल्ह्यात केल्याची माहिती दिली तसेच पर्यावरण संरक्षणासाठी व अवैध बांधकामे रोखण्यासाठी तातडीने अधिक तीव्र मोहीम केली जाईल असे सांगितले.

वृक्षांचे संरक्षण गरजेचेवृक्षारोपण करतांना झाडांचे संगोपन होणे, संरक्षण करणे गरजेचे असून त्यासाठी वन विभागाने काळजी घ्यावी असेही पालकमंत्री यांनी सांगितले. त्यासाठी वन विभागाच्या चौक्या उभारणे, कुंपण घालणे, वेळच्यावेळी वाळलेले गावात काढणे, चर खोदणे अशी कामे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील पाणी समस्या, रस्ते, विजेचे प्रश्न य बाबीनाव्र संबंधित मंत्री व सचिव यांच्या समवेत बैठका लावाव्यात असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यासाठी 2013 वर्षासाठीचे व्हिजन डॉक्यूमेंटप्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रास्ताविक करून सांगितले प्रशासनाच्या बाबतीत  संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक बदल कसा घडून येईल, याचाच प्रयत्न करण्यात येत आहे, आणि म्हणूनच जिल्ह्यासाठी २०१३ या वर्षापर्यंतचे व्हिजन डॉक्यूमेंट पुण्याच्या सायन्स एंड टेक्नोलॉजी पार्कतर्फे तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. लोकप्रतिनिधींनी यात आपल्या सूचना द्याव्यात असेही ते म्हणाले. बेरोजगारी आणि युवकांमधील तंत्र कौशल्याचा अभाव यावर लक्ष्य केंद्रित करून ठाणे आणि कल्याण येथे कौशल्य विकास केंद्रे उभारून गरीब,आदिवासी मुलांना मोफत प्रशिक्षण देणे सुरु केल्याचे सांगून त्यांनी या पुढील काळात कातकरी समाजातील प्रत्येकला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे आणि विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती, उद्योग यांचीही यात मदत घेतली जाईल अशी माहिती दिली. रोखमुक्त व्यवहाराना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालायार्फे मोहीम राबविण्यात येत आहेसेही त्यांनी सांगितले.

यावेळी भिवंडी येथील शवागृहाचे दुरुस्ती काम, एमएमआरडीए रस्त्याची कामे,वाढीव वीज देयके, डिजिटल शाळा, अंगणवाडी अशा काही मुद्द्यांवर लोकप्रतीनिधीनी आपल्या सुचना दिल्या.

आजच्या बैठकीस खासदार कपिल पाटील यांनी देखील नियोजन आणि अंमलबजावणी अधिक गांभीर्याने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मलंगगड येथील विकास कामे झपाट्याने पूर्ण व्हावीत असे सांगितले. अपदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, महेश चौगुले, ज्योती कलानी, रुपेश म्हात्रे, संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर यांनी देखील महत्वपूर्ण सुचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक भीमनवार त्याचप्रमाणे भिवंडी व मीरा भाईंदर पालिका आयुक्त यांची देखील उपस्थिती होती.

बैठकीत सादरीकरण सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केले. प्रारंभी विधानपरिषदेचे उप सभापती स्व वसंत डावखरे यांच्या निधनाबद्धल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.     

टॅग्स :thaneठाणे