शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेची थकीत ५०० कोटींची पाणीपट्टी माफ, शासनाचा निर्णय

By सदानंद नाईक | Updated: March 13, 2023 09:16 IST

महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती.

उल्हासनगर : महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीपट्टीची ७०० पैकी ५०० कोटींची दंडात्मक रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बैठकीला महापालिका अधिकारी व स्थानिक नेते उपस्थित होते. 

उल्हासनगर महापालिकडे स्वतःचे पाणी स्त्रोत नसल्याने, एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला होतो. महापालिकेला १२० एमएलडी पाण्याचा कोटा मंजूर असून त्यावरील पाण्यासाठी १२ रुपये प्रति एमएलडी असा दीडपट दर आकारण्यात येत होता. तो दर देखील ८ रुपये प्रति एमएलडी करण्याचा निर्णय उदय सामंत यांनी रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. अशी माहिती शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मंजूर कोट्यापेक्षा अधिकच्या पाणी पुरवण्यासाठी एमआयडीसी जादा दराने देयक आकारत असल्याने, थकबाकीची रक्कम ७०० कोटीवर गेली. यापूर्वी उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठका झल्या होत्या. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने थकबाकी रक्कमे बाबत बैठक होऊन तब्बल ५०० कोटींची दंडात्मक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुद्दल सुमारे २०० कोटी रूपये पुढील दहा वर्षात योग्य हप्त्यात भरण्याची योजना एमआयडीसीने करण्याचे निर्देश उधोगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेला मोठा दिलासा मिळाला असून गेल्या अनेक वर्षापासूनचा थकबाकीची विषय निकाली निघाला आहे. 

सामंत यांच्याकडील बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी बी‌.डी. मलिकनेर, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, अभियंता बी एस पाटील इत्यादी उपस्थित होते. तर शिवसेनेकडून पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर संघटक नाना बागुल, अरूण आशान, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज आदीजन उपस्थित होते.

स्वतःचा पाणी स्रोतची मागणी शहराच्या हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी जात असून नदीतील पाणी उचलून उल्हासनगरला पुरवठा करण्यात येत आहे. त्यापेक्षा नदी किनारी महापालिकेने स्वतःचा पाणी स्रोत निर्माण केल्यास, नागरिकांना मुबलक कमी दरात पाणी मिळणार आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक राजकीय नेत्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUday Samantउदय सामंत