शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

जुन्या पेन्शनसाठी जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना ५० हजार पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:56 IST

महाराष्ट्र शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी एक परिपत्रक काढून १ नोव्हेंबर २००५ पेंशन योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डिसीपीएस/एनपीएस) लागू केली.

ठाणे/किन्हवली : महाराष्ट्र शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी एक परिपत्रक काढून १ नोव्हेंबर २००५ पेंशन योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डिसीपीएस/एनपीएस) लागू केली. यास विरोध करून पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू करा, या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातून ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना ५० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. यामध्ये तीस हजार पोस्टकार्ड व वीस हजार ई-मेलचा समावेश आहे.‘जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्त्वाखाली ही ५० हजार पत्रं पाठवण्यात येत आहेत. पत्र मोहिमेची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषाताई जाधव व शहापूर आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करणार आहेत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यू व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य असुरिक्षत झाल्याचा आरोप केला जात आहे. नव्या योजनेबाबत कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरलेला आहे.लढ्यात सहभागी होण्याचे आवाहनविरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्कालीन आघाडी शासनाकडे २००५ नंतरच्या कर्मचाºयांनाही जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली होती. याची त्यांना आठवण करून देण्यासाठीच ही पत्रमोहीम हाती घेतल्याचे जुनी पेन्शन संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांनी सांगितले.३१आॅक्टोबरचा हा काळा निर्णय व कर्मचाºयांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या या लढ्यात समाजातील सुज्ञ नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, कर्मचारी-शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या नावे जुनी पेन्शन मागणीचे एक पत्र लिहून सहभागी होण्याचे अवाहनही लुटे यांच्यासह सरचिटणीस दीपक पाटील आदी पदाधिकाºयांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस