शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पाच महिन्यांत १३१ कोटींची मालमत्ताकराची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:50 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका : वसुलीचे लक्ष्य ४८५ कोटी रुपये

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने पाच महिन्यांत १३१ कोटींची वसुली केली आहे. यावर्षी मालमत्ताकर वसुलीचे लक्ष्य ४८५ कोटींचे असून हे लक्ष्य गाठण्यासाठी सात महिने महापालिका प्रशासनाच्या हाती आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे दिल्यानंतर त्याचा करवसुलीच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेने एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ अखेर ३५१ कोटींच्या मालमत्ताकराची वसुली केली होती. वसुलीचे काम दरवर्षी डिसेंबरनंतर वेग घेते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांत महापालिका जप्ती, लिलाव या माध्यमातून वसुलीचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करते. महापालिकेच्या उत्पन्नाची मदार ही मालमत्ताकर वसुलीवर आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. या कामासाठी फेब्रुवारीपासूनच काही कर्मचारी लोकसभा निवडणूक कामासाठी घेतले होते. तेव्हा आयुक्तांनी करवसुलीवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना न घेण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली होती; मात्र ही मागणी मान्य झाली नव्हती.वसुलीचे यंदा ४८५ कोटींचे लक्ष्य ठेवले असून एप्रिलपासूनच वसुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट २०१९ अखेरपर्यंत महापालिकेने १३१ कोटींच्या मालमत्ताकराची वसुली केली आहे. येत्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेदरम्यान सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये वसुलीला ब्रेक लागणार आहे.महापालिकेचे एकूण दहा प्रभागक्षेत्र आहेत. त्यामध्ये १२२ प्रभाग असून दहा प्रभाग क्षेत्रांपैकी ‘ई’, ‘आय’ आणि ‘जे’ हे तीन प्रभाग २७ गावांतील आहे. २७ गावांतून मालमत्ताकराच्या वसुलीचे प्रमाण कमी आहे. अवघ्या पाच महिन्यांत एकूण वसूल झालेल्या १३१ कोटींमध्ये २७ गावांतील तीन प्रभागक्षेत्रांतून २२ कोटींची वसुली झाली, तर उर्वरित अन्य आठ प्रभागांतून झाली आहे. तिचा आकडा १०९ कोटी रुपये इतका आहे. २७ गावांत असलेल्या औद्योगिक कारखान्यांकडून एलबीटी कराची थकबाकी येणे अपेक्षित होते. एलबीटीच्या या थकबाकीवर महापालिकेने व्याज आणि दंड आकारला होता. ही रक्कम कारखानदारांना मान्य नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी २७ गावांतील एलबीटीप्रकरणी अभय योजना लागू केल्याने महापालिकेस मिळणाºया जवळपास १०० कोटींच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. त्याचबरोबर २७ गावांतील मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची बिले मान्य नाहीत. दहापटीने जास्त कर आकारणी केल्याचा मुद्दा या गावातील मालमत्ताधारकांनी लावून धरला आहे. सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीने यासंदर्भात एक विशेष बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे नुकतीच केली आहे.रस्त्यांसाठी ३२७ कोटींची मागणीअतिवृष्टीमुळे २७ गावांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील रस्तेदुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांनी सरकारकडे ३२७ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. महापालिकेचा आर्थिक डोलारा हा करवसुलीशी निगडित आहे. त्यामुळे वसुलीचे लक्ष्य गाठले गेले नाही तर विकासकामांना ब्रेक लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका