शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

४५ इमारती ठरवल्या जीर्ण!

By admin | Updated: May 25, 2016 04:32 IST

श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता, त्यांना कोणतीही पूर्व$सूचना न देता येथील सुमारे ४५ इमारतींना पालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत

ठाणे : श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता, त्यांना कोणतीही पूर्व$सूचना न देता येथील सुमारे ४५ इमारतींना पालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट करून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. काही बड्या राजकीय नेत्यांचे व बिल्डरांचे हितसंबंध जपण्याकरिता हेतूत: चांगल्या इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.ठाणे महापालिकेने मागील महिन्यात शासनाच्या नव्या धोरणानुसार शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे नव्याने सर्व्हेक्षण केले होते. त्यानंतर या इमारतींची वर्गवारी करुन ज्या इमारती ‘सी वन’मध्ये आल्या असतील त्या तत्काळ तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मागील वर्षी शहरात ३६ अतिधोकादायक इमारती होत्या. यंदा नव्या निकषानुसार शहरात ८९ इमारती या अतिधोकादायक ठरल्या आहेत. शहरातील एकूण ३ हजार ६०७ इमारती या धोकादायक घोषित केल्या आहेत. परंतु, इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यापूर्वी त्या संदर्भातील नोटीस देणे अपेक्षित होते. तसेच इमारत जर धोकादायक ठरली असेल तर सदर इमारतधारकांना स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगितले जाते. त्यानंतरच ती रहिवासाकरिता धोकादायक घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता पालिकेने श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील ४५ इमारतींना धोकादायक जाहीर केले आहे. पालिकेने अशा प्रकारे कारवाई करताना प्रथम विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता आणि इमारती सुस्थितीत असताना अशाप्रकारे केवळ नोटीसा बजावून पालिकेने त्या तोडण्याचा घाट घालण्याचे कारस्थान केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात येथील रहिवाशांनी आवाज उठविल्यानंतर महापौर संजय मोरे यांनी मध्यस्थी करून चुकून अशा प्रकारच्या नोटीस काढल्याचे सांगत सारवासारव केली. (प्रतिनिधी)महापालिकेचा हा अजब कारभार असून अशा प्रकारे सुस्थितीत असलेल्या इमारती कुठलीही शहानिशा न करता धोकादायक कशा ठरवू शकते. १९८५ च्या आसपास या इमारती बांधल्या असून त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. पालिकेने धोकादायक घोषीत करण्यापूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगणे अपेक्षित होते. - प्रदीप इंदूलकर, स्थानिक रहिवासी ठाणे शहरातील काही इमारतींना अशा पद्धतीने जर नजरचुकीने धोकादायक इमारती ठरवून महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या असतील तर तातडीने निर्णय घेवून या नोटीसा मागे घेण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. - संजय मोरे, महापौर - ठामपा