शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कल्याणहून मुंबईसाठी सोडल्या ४१५ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:54 IST

प्रवाशांना दिलासा : गर्दीचे नियोजन

डोंबिवली : डोंबिवली ते मुंबई प्रवासासाठी अपुऱ्या बससेवेमुळे सोमवारी पाच तास लागल्याच्या त्रासदायक अनुभवानंतर मंगळवारी काही चाकरमान्यांनी घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. मात्र कल्याणमध्ये मुंबईला जायला बस सुविधा सुरू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्थानकात तोबा गर्दी झाली होती. मुंबई, ठाणे, बदलापूर मार्गावर दिवसभरात ४१५ लालपरी मंगळवारी सोडण्यात आल्याने गर्दी आटोक्यात आली.

राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण, डोंबिवलीमध्ये झालेली गर्दी बघता मंगळवारी जादा बसगाड्या मागविण्यात आल्या. त्यामुळे सकाळपासून गर्दीवर नियंत्रण मिळाले होते. सोमवारी अनलॉक झाले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. साहजिकच एसटी बसगाड्या जेवढ्या प्रमाणात हव्या होत्या तेवढ्या आल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली, प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बसगाड्या मागविण्यात आल्या.सकाळच्या सत्रात दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई, ठाण्याकडे जाण्याकरिता १६५ बस सोडल्या होत्या, तसेच २ ते संध्याकाळी ५ पर्यंत १५० बस सुटल्या होत्या. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत आणखी १०० बस सोडल्याची माहिती कल्याणमधील महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कल्याणमध्ये एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टन्स चांगल्या पद्धतीने पाळले गेले. एका बसमधून ३५ प्रवाशांनी प्रवास केला. डोंबिवली येथेदेखील एसटी बस, खासगी वाहने यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गर्दी फारशी दिसून आली नाही. रामनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी सकाळपासून इंदिरा चौकात कडक बंदोबस्त ठेवून रांग लावण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते.‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ने मंगळवारी डोंबिवली- मुंबई प्रवासासाठी पाच तास लागल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये सोमवारी चाकरमान्यांना जो त्रास झाला त्याविरुद्ध आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत राज्य परिवहन मंडळाने मंगळवारी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईला अत्यावश्यक सेवेकरिता जाणाºया कर्मचाºयांनी तसेच अन्य खासगी आस्थापनांमधील कर्मचाºयांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.