शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कल्याणहून मुंबईसाठी सोडल्या ४१५ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:54 IST

प्रवाशांना दिलासा : गर्दीचे नियोजन

डोंबिवली : डोंबिवली ते मुंबई प्रवासासाठी अपुऱ्या बससेवेमुळे सोमवारी पाच तास लागल्याच्या त्रासदायक अनुभवानंतर मंगळवारी काही चाकरमान्यांनी घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. मात्र कल्याणमध्ये मुंबईला जायला बस सुविधा सुरू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्थानकात तोबा गर्दी झाली होती. मुंबई, ठाणे, बदलापूर मार्गावर दिवसभरात ४१५ लालपरी मंगळवारी सोडण्यात आल्याने गर्दी आटोक्यात आली.

राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण, डोंबिवलीमध्ये झालेली गर्दी बघता मंगळवारी जादा बसगाड्या मागविण्यात आल्या. त्यामुळे सकाळपासून गर्दीवर नियंत्रण मिळाले होते. सोमवारी अनलॉक झाले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. साहजिकच एसटी बसगाड्या जेवढ्या प्रमाणात हव्या होत्या तेवढ्या आल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली, प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बसगाड्या मागविण्यात आल्या.सकाळच्या सत्रात दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई, ठाण्याकडे जाण्याकरिता १६५ बस सोडल्या होत्या, तसेच २ ते संध्याकाळी ५ पर्यंत १५० बस सुटल्या होत्या. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत आणखी १०० बस सोडल्याची माहिती कल्याणमधील महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कल्याणमध्ये एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टन्स चांगल्या पद्धतीने पाळले गेले. एका बसमधून ३५ प्रवाशांनी प्रवास केला. डोंबिवली येथेदेखील एसटी बस, खासगी वाहने यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गर्दी फारशी दिसून आली नाही. रामनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी सकाळपासून इंदिरा चौकात कडक बंदोबस्त ठेवून रांग लावण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते.‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ने मंगळवारी डोंबिवली- मुंबई प्रवासासाठी पाच तास लागल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये सोमवारी चाकरमान्यांना जो त्रास झाला त्याविरुद्ध आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत राज्य परिवहन मंडळाने मंगळवारी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईला अत्यावश्यक सेवेकरिता जाणाºया कर्मचाºयांनी तसेच अन्य खासगी आस्थापनांमधील कर्मचाºयांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.