शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

कल्याणहून मुंबईसाठी सोडल्या ४१५ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:54 IST

प्रवाशांना दिलासा : गर्दीचे नियोजन

डोंबिवली : डोंबिवली ते मुंबई प्रवासासाठी अपुऱ्या बससेवेमुळे सोमवारी पाच तास लागल्याच्या त्रासदायक अनुभवानंतर मंगळवारी काही चाकरमान्यांनी घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. मात्र कल्याणमध्ये मुंबईला जायला बस सुविधा सुरू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्थानकात तोबा गर्दी झाली होती. मुंबई, ठाणे, बदलापूर मार्गावर दिवसभरात ४१५ लालपरी मंगळवारी सोडण्यात आल्याने गर्दी आटोक्यात आली.

राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण, डोंबिवलीमध्ये झालेली गर्दी बघता मंगळवारी जादा बसगाड्या मागविण्यात आल्या. त्यामुळे सकाळपासून गर्दीवर नियंत्रण मिळाले होते. सोमवारी अनलॉक झाले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. साहजिकच एसटी बसगाड्या जेवढ्या प्रमाणात हव्या होत्या तेवढ्या आल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली, प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बसगाड्या मागविण्यात आल्या.सकाळच्या सत्रात दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई, ठाण्याकडे जाण्याकरिता १६५ बस सोडल्या होत्या, तसेच २ ते संध्याकाळी ५ पर्यंत १५० बस सुटल्या होत्या. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत आणखी १०० बस सोडल्याची माहिती कल्याणमधील महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कल्याणमध्ये एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टन्स चांगल्या पद्धतीने पाळले गेले. एका बसमधून ३५ प्रवाशांनी प्रवास केला. डोंबिवली येथेदेखील एसटी बस, खासगी वाहने यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गर्दी फारशी दिसून आली नाही. रामनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी सकाळपासून इंदिरा चौकात कडक बंदोबस्त ठेवून रांग लावण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते.‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ने मंगळवारी डोंबिवली- मुंबई प्रवासासाठी पाच तास लागल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये सोमवारी चाकरमान्यांना जो त्रास झाला त्याविरुद्ध आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत राज्य परिवहन मंडळाने मंगळवारी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईला अत्यावश्यक सेवेकरिता जाणाºया कर्मचाºयांनी तसेच अन्य खासगी आस्थापनांमधील कर्मचाºयांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.