शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तब्बल ४० हजार घरांची नोंदणी रखडली, १५ कोटींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 02:55 IST

कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

ठाणे : कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.कल्याण - डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे तपासल्याशिवाय घरांची नोंदणी करू नये, असे आदेश सहा महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधकांना दिले होते. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावत दुय्यम निबंधक कार्यालयाने पालिका कार्यक्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सरसकट घरांची दस्त नोंदणीच बंद केली. नव्याने घर विकत घेतलेल्या नागरिकांना या बंदीचा फटका बसला आहे.जिल्हा निबंधक कार्यालयाने केवळ अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत घरांची नोंदणी बंद करावी, असे स्पष्ट आदेश दिले असल्याने सरसकट बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी तत्काळ सुरू करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दुर्वास चव्हाण यांनी दिला आहे.दरम्यान घरांची नोंदणी बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नसून सहाय्यक दुय्यम निबंधकांनी घरांचे रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिल्यास त्याविरोधात जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निबंधकांकडे दाद मागावी, असे सह जिल्हा निबंधक दि. प. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे