शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

तब्बल ४० हजार घरांची नोंदणी रखडली, १५ कोटींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 02:55 IST

कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

ठाणे : कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.कल्याण - डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे तपासल्याशिवाय घरांची नोंदणी करू नये, असे आदेश सहा महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधकांना दिले होते. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावत दुय्यम निबंधक कार्यालयाने पालिका कार्यक्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सरसकट घरांची दस्त नोंदणीच बंद केली. नव्याने घर विकत घेतलेल्या नागरिकांना या बंदीचा फटका बसला आहे.जिल्हा निबंधक कार्यालयाने केवळ अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत घरांची नोंदणी बंद करावी, असे स्पष्ट आदेश दिले असल्याने सरसकट बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी तत्काळ सुरू करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दुर्वास चव्हाण यांनी दिला आहे.दरम्यान घरांची नोंदणी बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नसून सहाय्यक दुय्यम निबंधकांनी घरांचे रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिल्यास त्याविरोधात जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निबंधकांकडे दाद मागावी, असे सह जिल्हा निबंधक दि. प. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे