शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४० हजार घरांची नोंदणी रखडली, १५ कोटींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 02:55 IST

कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

ठाणे : कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.कल्याण - डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे तपासल्याशिवाय घरांची नोंदणी करू नये, असे आदेश सहा महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधकांना दिले होते. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावत दुय्यम निबंधक कार्यालयाने पालिका कार्यक्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सरसकट घरांची दस्त नोंदणीच बंद केली. नव्याने घर विकत घेतलेल्या नागरिकांना या बंदीचा फटका बसला आहे.जिल्हा निबंधक कार्यालयाने केवळ अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत घरांची नोंदणी बंद करावी, असे स्पष्ट आदेश दिले असल्याने सरसकट बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी तत्काळ सुरू करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दुर्वास चव्हाण यांनी दिला आहे.दरम्यान घरांची नोंदणी बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नसून सहाय्यक दुय्यम निबंधकांनी घरांचे रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिल्यास त्याविरोधात जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निबंधकांकडे दाद मागावी, असे सह जिल्हा निबंधक दि. प. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे