शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाणे जिल्ह्यातील आपत्ती निवारण, उपाययाेजनांसाठी चार काेटी

By सुरेश लोखंडे | Updated: April 25, 2023 19:28 IST

आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

ठाणे : मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये. आपत्ती आली तरी त्याचे परिणाम तीव्र होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिल्या. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने चार काेटींची तरतूद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.

महापालिकांसह, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन आदी संबंधित यंत्रणांचा आपत्ती नियंत्रण व उपाययाेजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करत तहसीलदार राजाराम तवटे यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, एनडीआरएफ, पोलिस, गृहरक्षक दल यांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांना प्रशिक्षण

आपत्ती सौम्यीकरणासाठी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. या निधीतून आपत्ती निवारण व इतर कामांसाठी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे चार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनही आवश्यक ते साहित्य घेण्यात येणार आहे. आपत्ती काळात जलद प्रतिसादासाठी जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कोणत्याही आपत्ती काळात हे आपदा मित्र मदतीसाठी तयार आहेत, असेही सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.