शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात आगीच्या ३८५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:28 IST

एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे

सचिन सागरेकल्याण : एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अशा घटनांना तोंड देताना चांगलीच दमछाक होताना दिसते.कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन विभागाला पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, भिवंडी, मुरबाड आदी आसपासच्या शहरांतही ही सेवा पुरवली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचवणे आदी जबाबदारीही पार पाडावी लागते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात आगीच्या ३८५ तसेच झाडे पडण्याच्या ५१५ आणि इतर ३०४ घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. २२८ मंजूर पदे असून त्यापैकी अवघे १०७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया संख्येमुळेच कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाºयांना सहन करावा लागतो आहे.टिटवाळा शहराची लोकसंख्या सध्या वाढते आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा कालावधी लक्षात घेता अग्निशमन कार्यालय असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यातही आवश्यक कर्मचारी मिळाल्यास आम्ही येथे तातडीने अग्निशमन कार्यालय सुरू करू.- सुधाकर कुलकर्णी (फायर आॅफिसर)