शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

१५ निवडणुकांत लढले ३८ पक्ष; सहा पक्षांच्या खासदारांनी गाठली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:36 IST

काँग्रेसचे सर्वाधिक १० खासदार विजयी

- अजित मांडके ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी, पालघर या लोकसभा मतदारसंघांत गेल्या १५ निवडणुकांमध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यानुसार, यातील सहाच पक्षांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेली आहे. त्यात सर्वाधिक १० वेळा भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे खासदार निवडून गेले असून, त्याखालोखाल भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती १९५१ मध्ये झाली असली, तरी त्यानंतर भिवंडी, डहाणू अशा मतदारसंघांत विभागणीसुद्धा झाली होती. तर, १९६२ मध्ये ठाणे आणि भिवंडी असासुद्धा हा मतदारसंघ होता. त्यानंतर, खऱ्या अर्थाने १९७७ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर, २००९ मध्ये ठाणे जिल्ह्याची पुनर्रचना होऊन पालघर, कल्याण आणि भिवंडी अशी लोकसभा मतदारसंघांची विभागणी झाली. त्यात, पालघर हा जिल्हाच वेगळा झाला आहे. हे सर्व मतदारसंघ मिळून नोंदणीकृत ३८ पक्षांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यात, ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा विजय संपादन केला आहे. याच मतदारसंघातून शिवसेना पाच, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एक आणि सीपीआयने एकदा, जनता पार्टीनेसुद्धा एकदा विजय मिळवला आहे. पूर्वाश्रमीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा, तर भारतीय जनता पार्टीने दोन वेळा विजय संपादन केला आहे. २००९ मध्ये ठाणे मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांची निर्मिती झाली. त्यावेळी २००९ आणि २०१४ मध्ये कल्याणमधून शिवसेना विजयी झाली, तर भिवंडीत २००९ मध्ये काँग्रेस आणि २०१४ मध्ये भाजपला विजयी मिळवता आला आहे.१९७७ नंतर कॉँग्रेस नामशेषजिल्ह्यातील तीनही मतदारसंघ हे एकेकाळी कॉँग्रेसचे बालेकिल्ले होते. कॉँग्रेसमध्ये फूट पडूनही या जिल्ह्याने कॉँग्रेसवर विश्वास दाखवला होता. मात्र, १९७७ पासून ठाणे आणि कल्याण मतदारसंघांत कॉँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. मात्र, २००९ मध्ये भिवंडीत काँग्रेसने विजय मिळवला होता. आता आघाडीच्या जागावाटपातही तीनपैकी ठाणे आणि कल्याण राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. तर, भिवंडी काँग्रेसकडे आला आहे. काँग्रेसचे येथून १० खासदार निवडून गेले आहेत. त्याखालोखाल शिवसेना पाच, भाजप दोन, सीपीआय दोन आणि जनता पार्टी व राष्टÑवादीचा प्रत्येकी एक खासदार संसदेत गेले आहेत. परंतु, काँग्रेसचे अस्तित्व मात्र १९७७ पासून संपुष्टात आले आहे, तर १९८४ मध्ये पुन्हा काँगे्रसने विजय मिळवला होता. त्यानंतर, मात्र या पक्षाचे अस्तित्व संपले.हे लढले पक्ष : तीनही मतदारसंघ मिळून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेस, समाजवादी पक्ष, भाजप, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, आप, भारिप, दूरदर्शी, लोकदल बी, बहुजन समाज, जनता पार्टी, बसपा, जनता दल, एसएमसी, सीपीआय, तिवारी (काँ.), एसजेपीएम, राष्टÑीय समाज पक्ष, नॅपॅपा, अभासे, ईयूयूसी, हिंजपा, प्रारिपा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्टÑीय क्रांतिकारी, क्रांतिकारी जयहिंद सेना, नवभारत निर्माण पार्टी, भारिप बहुजन महासंघ, इंडियन युनियन मुस्लिम लीग, क्रांतिकारी महाराष्टÑ, राष्टÑवादी जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी आदी छोट्यामोठ्या पक्षांनी निवडणूक लढवली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019