शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना 38 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:37 IST

यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ठाणे जिल्ह्यात १ जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या नऊ जणांच्या वारसांना तर, वीज पडून जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना मिळून ३८ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली. तर, लहानमोठ्या दुधाळ जनावरांसह ओढकाम करत असलेल्या मोठ्या जनावरांसाठी एक लाख ४० हजारांची मदत दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यातील शेतपिकांसह जनावरांनादेखील बसला. जिल्ह्यात अनेक जण वीज पडून जखमी झाले. तर, अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्यांना व मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत असते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात जून  ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर आणि मुरबाड या सात तालुक्यांतील बाधितांचे पंचनामे केले असून त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटपदेखील केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार राजराम तवटे यांनी दिली. 

यामध्ये जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान झाले होते. तर, जून ते ऑक्टोबर या काळात वीज पडून व मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवून जिल्ह्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या नातेवाइकांना व वीज पडून जखमी झालेल्यांना ३७ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

त्या’ शेतकऱ्यांना दीड लाखांची मदतजिल्ह्यात काही पशू व जनावरांचे मृत्यू झाले होते. या मृत पावलेल्या जनावरांसाठीची एक लाख ४० हजारांची मदत संबंधित शेतकऱ्यांंना देण्यात आली.