शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणवेशाच्या नावाखाली ३६ लाखांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:46 IST

कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.

ठाणे -  कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यानंतर अखेर प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या ठाणे परिवहनसेवेत केवळ ४०० वाहक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार झाला आहे. परंतु, असे असताना या कंत्राटदाराने ९०० वाहक घेतले आहेत. त्यांच्याकडून गणवेशाच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार रु पये घेतले असल्याचा आरोप परिवहन सदस्य संजय भोसले यांनी केला. या माध्यमातून तब्बल ३६ लाख रु पयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सदस्य दशरथ यादव यांनी हा ठेकेदार गणवेशाचे तीन हजार रु पये घेतोच, शिवाय जर एखादा कामगार एक दिवस गैरहजर राहिल्यास त्याच्या वेतनातून एक हजार रु पये वजा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यावर प्रभारी परिवहन सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच प्रत्यक्षात जाऊन याची पाहणी करून त्यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.जास्त कामगार कसे?सदस्य दशरथ यादव आणि प्रकाश पायरे यांनी संबंधित ठेकेदाराशी ४०० कामगार घेण्याचा करार केला असताना तो ९०० कामगार कसे घेतो, असा सवाल केला. त्यावर, आपण केवळ ४०० कामगारांचे वेतन अदा करतो, असे उत्तर प्रशासनाने दिले.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाCorruptionभ्रष्टाचार