शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतिनिमित्त चित्रकला स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 19:01 IST

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त डोंबिवलीत बालभवनमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

डोंबिवली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त डोंबिवलीत बालभवनमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेला म्हात्रेनगर, रामनगर आणि शहरातील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. आई वडीलांसमवेत माझा वाढदिवस, बेटी बचाव बेटी पढाव, कमळ यांसारख्या असंख्य विषयांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. पाचहून अधिक गटांमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रचंड हौशीने सहभाग उत्तमोत्तम चित्रे रेखाटल्याची माहिती आयोजक ज्येष्ठ नगरसेवक विषू पेडणेकर यांनी दिली.बालभवन येथील मीनी थिएटरमध्ये मंगळवारी सकाळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही स्पर्धा घेण्यात आी होती. त्यामधील पहिली ते दुसरीच्या गटामध्ये चैतन्य कदम, मनुश्री महाजन, मधुरा कोंडे, तिसरी चौथीच्या गटात मनुश्री इंगळे, किमया साठे, सप्तशी सरकार आदींसह उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाचवी ते सातवी च्या गटामध्ये खुशी मौर्या, मुग्धा कोंडे, अद्वैत नायर आणि ८ वी ते १० वीच्या गटामध्ये श्रेयसी दुर्वे, रूचा जोशी, यशोधन विचारे आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या गटामध्येही उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. खुल्या गटामध्ये संजना गजीनकर, मृदुला राणे, सोनाली सोमवंशी आदींना सन्मानित करण्यात आल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.या स्पर्धेसाठी विद्यानिकेतन, पाटकर विद्यालय, डॉन बॉस्को, सिस्टर निवेदीता, रॉयल इंटरनॅशनल, बी.आर. मढवी, होली एंजल, एस.के.पाटील, मॉडेल इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रूपारेल महाविद्यालय, साऊथ इंडियन, ब्लॉसम स्कूल, सेंट मेरी, सेंट तेरेसा शाळा, होली एंजल शाळा, टिळकनगर विद्यामंदिर आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित कासार, अमित टेमकर, रवी साळवी, संतोष देसाई, पुर्णिमा पेडणेकर, रसिका जोशी, संचिता परब आदींचे योगदान मोलाचे असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पर्धा निकोप असावी, विद्यार्थ्यांनी विजिगिषू वृत्ती अंगी बाणावी, यशाने हुरळून जाऊ नये, अपयशाने खचून जाऊ नये. तसेच परिश्रमाचे सातत्य आणि कर्तबगारांची आत्मचरित्र वाचावीत, जेणेकरून आयुष्याला एक दिशा मिळेल. प्रामाणिकपणे जीवन जगावे असे आवाहन केले. चव्हाण यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.