शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

३५ गणेश मंडळांचा प्रचंड दणदणाट, ठाणे पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:31 IST

बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची तीव्रता चढविणाऱ्या ठाणे शहर आयुक्तालयातील तब्बल ३५ गणेश मंडळांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलिसांनी ते प्रस्ताव

ठाणे  - बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची तीव्रता चढविणाऱ्या ठाणे शहर आयुक्तालयातील तब्बल ३५ गणेश मंडळांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलिसांनी ते प्रस्ताव एमपीसीबी अर्थात महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडेमंगळवारी धाडले. यामध्ये सार्वधिक उल्हासनगर परिमंडळातील तब्बल २० मंडळांचा समावेश आहे. तर दुसरीक डे भिवंडी परिमंडळातील एकाही मंडळाविरोधात प्रस्ताव नसल्याचे दिसते. ज्या मंडळानी ९० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची पातळी ओलांडली त्यांच्याविरोधात प्रस्ताव तयार केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषणाबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किंवा महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांवर सोपवली आहे. त्यामुळे पूर्वी गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारा ६० दिवसांचा कलावधी यामुळे कमी झाला आहे.तर स्थानिक पोलिसांना मोठमोठ्याने आवाज करणाºया मंडळांच्या मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषणाबाबत रिडींग घेण्यास सांगितले. तसेच दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाची तीव्रता केल्यास त्याच्या तीन कॉपी काढून संबंधित मंडळाच्या जबाबदार व्यक्तीला एक कॉपी देऊन पंचनामा करून जबाबही नोंदवावेत. जर ते शांतता क्षेत्र असल्यास तेथील नागरिकांचे जबाब घ्यावेत.तसेच डीजे यासारखे संबंधित मुद्देमाल जप्त करावा, पंचनामा करताना जप्त मुद्देमालाची पावती तेथेच द्यावी,असे आदेश आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांनी गोपाळकालाप्रमाणे गणेशोत्सवातही चालढकलपणा केल्याचे समोर आले आहे.कारण विसर्जनाला चोवीस तास झाल्यानंतर मंगळवारी ३५ मंडळांविरोधात ध्वनीप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वेय गुन्हे दाखल करण्याबाबत प्रस्ताव पोलिसांकडून महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे सादर केले आहेत.आव्हाडांच्या मंडळाविरोधात प्रस्तावप्रमुख सल्लागार असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शहरातील नरवीर तानाजी सार्वजनिक मंडळासह हिंदू जनजागृती मित्र मंडळ, चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ आणि हरी भोले मित्रमंडळ या मंडळाविरोधात प्रस्ताव नौपाडा पोलिसांद्वारे तयार करण्यात आला आहे. उर्वरित परिमंडळातील गणेश मंडळांबाबत प्रस्ताव तयार केलेल्या मंडळांची नावे समजू शकलेली नाहीत.४३ मंडळांना नोटिसामहाराष्टÑ पोलीस कायद्यान्वये ४३ गणेश मंडळांना आवाज वाढवून ध्ननिप्रदूषण करू नये, याबाबत नोटिसा बजाविल्या असून यात सर्वाधिक ठाणे शहर परिमंडळातील २१ मंडळांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विनापरवानगी मिरवणूक काढल्याने गुन्हाडोंबिवली : अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी, सोमवारी परवानगी न घेता विसर्जन मिरवणूक काढल्याबद्दल श्री साईनाथ मित्रमंडळाच्या पदाधिकाºयांविरूद्ध विष्णूनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पश्चिमेतील जाधववाडी येथे श्री साईनाथ मित्रमंडळाने जाधववाडीच्या महाराजाच्या मूर्तीची स्थापना केली होती.डीजेवरील बंदीच्या निषेधार्थ गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र, मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी समजावल्यानंतर सोमवारी विसर्जन करण्यात आले. मात्र, विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने पोलिसांची परवानगी घेतली नव्हती.मिरवणुकीसाठी ट्रकवर रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतशबाजी करत वाहतुकीस अडथळाही निर्माण केला. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव, महेश जाधव, गणेश जाधव आणि इतर पदाधिकाºयांसह २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या