शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 00:08 IST

शिक्षण विभागाची माहिती; बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत.

सुरेश लोखंडे

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारातील बालकांचे त्यांच्या घराजवळच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या  शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहे. यानुसार, जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे. यापैकी पाच हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून १५२ विद्यार्थ्यांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. तर, उर्वरित तब्बल तीन हजार ४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील संबंधित शाळेत गेले नाही. त्यामुळे त्यांनी शालेय प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सीनिअर केजी या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील फक्त १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित तब्बल एक हजार ७५८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक अद्यापही शाळेत गेलेले नाहीत. तर, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण,  संचारबंदीमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे त्यांच्या निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, या कायद्याखाली प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांना विविध समस्यांमुळे, बहुतांश शाळांकडून मार्गदर्शन व सहकार्य न झाल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना या मोफत शालेय प्रवेशाला मुकावे लागले आहे.

मार्गदर्शनाअभावी पालक गोंधळले

आजपर्यंत केवळ १३४ बालकांचे प्रवेश मिळाल्याचे दिसून येत आले. तर, दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध समस्यांमुळे रद्द झाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या तब्बल एक हजार ७९२ विद्यार्थ्यांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे या बालकांचे शालेय प्रवेश रखडल्याचे उघड झाले आहे. यासाठी जूनमध्ये लॉटरी सोडतद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

कोरोना संचारबंदीसह शाळांमधील कर्मचाऱ्याची कमतरता, प्रवेशासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याच्या कारणाखाली ही प्रवेश प्रक्रिया रखडली. या समस्यांना तोंड दिल्यानंतर असहाय झालेल्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच दुसऱ्या शाळेत घेतलेले आहेत. तेथील प्रवेश रद्द करून आरटीईखाली मोफत प्रवेश मिळणाऱ्या शाळेत प्रवेश आता घ्यावा किंवा नाही, ही द्विधा स्थिती पालकांची झाली आहे. याशिवाय मार्गदर्शनाच्या अभावामुळे पालकवर्ग गोंधळलेला आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा