शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 00:08 IST

शिक्षण विभागाची माहिती; बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत.

सुरेश लोखंडे

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारातील बालकांचे त्यांच्या घराजवळच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या  शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहे. यानुसार, जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे. यापैकी पाच हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून १५२ विद्यार्थ्यांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. तर, उर्वरित तब्बल तीन हजार ४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील संबंधित शाळेत गेले नाही. त्यामुळे त्यांनी शालेय प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सीनिअर केजी या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील फक्त १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित तब्बल एक हजार ७५८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक अद्यापही शाळेत गेलेले नाहीत. तर, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण,  संचारबंदीमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे त्यांच्या निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, या कायद्याखाली प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांना विविध समस्यांमुळे, बहुतांश शाळांकडून मार्गदर्शन व सहकार्य न झाल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना या मोफत शालेय प्रवेशाला मुकावे लागले आहे.

मार्गदर्शनाअभावी पालक गोंधळले

आजपर्यंत केवळ १३४ बालकांचे प्रवेश मिळाल्याचे दिसून येत आले. तर, दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध समस्यांमुळे रद्द झाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या तब्बल एक हजार ७९२ विद्यार्थ्यांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे या बालकांचे शालेय प्रवेश रखडल्याचे उघड झाले आहे. यासाठी जूनमध्ये लॉटरी सोडतद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

कोरोना संचारबंदीसह शाळांमधील कर्मचाऱ्याची कमतरता, प्रवेशासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याच्या कारणाखाली ही प्रवेश प्रक्रिया रखडली. या समस्यांना तोंड दिल्यानंतर असहाय झालेल्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच दुसऱ्या शाळेत घेतलेले आहेत. तेथील प्रवेश रद्द करून आरटीईखाली मोफत प्रवेश मिळणाऱ्या शाळेत प्रवेश आता घ्यावा किंवा नाही, ही द्विधा स्थिती पालकांची झाली आहे. याशिवाय मार्गदर्शनाच्या अभावामुळे पालकवर्ग गोंधळलेला आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा