शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 00:08 IST

शिक्षण विभागाची माहिती; बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत.

सुरेश लोखंडे

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारातील बालकांचे त्यांच्या घराजवळच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या  शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहे. यानुसार, जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे. यापैकी पाच हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून १५२ विद्यार्थ्यांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. तर, उर्वरित तब्बल तीन हजार ४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील संबंधित शाळेत गेले नाही. त्यामुळे त्यांनी शालेय प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सीनिअर केजी या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील फक्त १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित तब्बल एक हजार ७५८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक अद्यापही शाळेत गेलेले नाहीत. तर, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण,  संचारबंदीमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे त्यांच्या निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, या कायद्याखाली प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांना विविध समस्यांमुळे, बहुतांश शाळांकडून मार्गदर्शन व सहकार्य न झाल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना या मोफत शालेय प्रवेशाला मुकावे लागले आहे.

मार्गदर्शनाअभावी पालक गोंधळले

आजपर्यंत केवळ १३४ बालकांचे प्रवेश मिळाल्याचे दिसून येत आले. तर, दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध समस्यांमुळे रद्द झाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या तब्बल एक हजार ७९२ विद्यार्थ्यांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे या बालकांचे शालेय प्रवेश रखडल्याचे उघड झाले आहे. यासाठी जूनमध्ये लॉटरी सोडतद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

कोरोना संचारबंदीसह शाळांमधील कर्मचाऱ्याची कमतरता, प्रवेशासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याच्या कारणाखाली ही प्रवेश प्रक्रिया रखडली. या समस्यांना तोंड दिल्यानंतर असहाय झालेल्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच दुसऱ्या शाळेत घेतलेले आहेत. तेथील प्रवेश रद्द करून आरटीईखाली मोफत प्रवेश मिळणाऱ्या शाळेत प्रवेश आता घ्यावा किंवा नाही, ही द्विधा स्थिती पालकांची झाली आहे. याशिवाय मार्गदर्शनाच्या अभावामुळे पालकवर्ग गोंधळलेला आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा