शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:30 IST

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली

- प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री यांच्यासोबत सोमवारी झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत ठाण्यातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याने ठाणे शहरासह जिल्ह्यातील ३०० गोविंदा पथकांनी दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाराज गोविंदा लवकरच एक बैठक घेऊन नव्या समन्वय समितीची स्थापना करणार आहेत.

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली, तसेच या बैठकीची कल्पनाही दिली नसल्याचे महाराष्ट्र समन्वय समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्र समन्वय समितीशी ठाणे जिल्हा समन्वय समिती संलग्न आहे. छोटे-मोठी मंडळे मिळून ३०० हून अधिक मंडळे ठाणे जिल्हा समन्वय समितीशी जोडली गेली आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल तेव्हा ठाणे शहराच्यावतीने एका गोविंदा पथकाच्या किमान एका पदाधिकाऱ्याला तरी मुख्य समितीकडून निमंत्रित केले जाईल, अशी ठाणे शहरातील गोविंदा पथकांची आशा होती. मात्र, ही आशा त्यांची फोल ठरली. मुंबईतील सात ते आठ पदाधिकारीच उपस्थित होते. त्यात एखादा ठाण्याचा पदाधिकारी घेऊ शकत होते, असे गोविंदा पथकांनी सांगितले. त्यामुळे मुख्य समन्वय समिती आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेले गोविंदा पथक लवकरच नवीन समन्वय समितीची स्थापना करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतून जे गोविंदा सोबत येतील त्यांना या समितीत घेतले जाईल. तसेच, लवकरच रूपरेषा ठरविली जाईल, असे ठाण्यातील गोविंदा पथकांनी सांगितले. 

गोविंदा पथकांच्या बाजूने या बैठकीत कोणती भूमिका मांडली, याची कल्पना ठाणे शहरातील गोविंदा पथकांना नाही. ठाण्यातील गोविंदा पथकांना विश्वासात न घेता ही बैठक झाल्याने मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य समितीवर ठाण्यातील दोन पदाधिकारी असतानादेखील निमंत्रित केले नाही. - समीर पेंढारे, उपाध्यक्ष,दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

आम्ही वेगळी समिती स्थापन करणार आहोत. मुख्य समिती आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.          - नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव मंडळ

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाण्यातून एकाला सहभागी केले नाही. येथेदेखील समन्वय समितीचे पदाधिकारी असून, एकाला तरी निमंत्रित करायला हवे होते. - सचिन खारकर, सहयोग गोविंदा पथक

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे