शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोकिळा व्रताचा ३० पासून श्रीगणेशा

By admin | Updated: July 30, 2015 00:32 IST

आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे.

ठाणे : आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे. शारीरिकदृष्ट्या सामान्य व कुरूप व्यक्तींमध्येही चांगले गुण असतात. त्यामुळे निसर्गरचनेत प्रत्येक घटकाला विशिष्ट स्थान आहे, ही या व्रताची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळेच आंब्याची लाकडे तोडणे व कोकिळादींना पिंजऱ्यात कोंडणे, या काळात बिलकूल स्थान नाही, हे ध्यानात घेऊन आजकालच्या सर्व सुशिक्षित स्त्रियांनी समाजप्रबोधन, निसर्ग व पक्षी संरक्षण, सामाजिक एकोपा व परस्पर स्नेहवृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने व सुजाणपणे करावे, अशी अपेक्षा आहे. तब्बल दीड तपानंतर येणारे तब्बल दीड तपानंतर येणारे कोकिळा व्रत इ.स. १७९० नंतर यंदा सिंहस्थ पर्वणीत आल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महिलावर्गात या व्रताची उत्सुकता वाढली आहे. महिनाभर चालणाऱ्या या व्रताचा श्रीगणेशा ३० जुलैपासून होत आहे.स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या महिलावर्गात या अनोख्या कोकिळा व्रताची सिद्धता करीत असून साधारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे व्रत केवळ तीन किंवा चार वेळेस येते तसेच अगदी बालपणीचे व्रत आठवत नसल्यानेतरु ण स्त्रियांमध्ये याबद्दल श्रद्धा, कुतुहल प्रकर्षाने व्यक्त होत आहे.आख्यायिकामाहेरी दक्ष प्रजापतीकडे यज्ञ सोहळा असूनही आमंत्रण नसलेली पार्वती शिवशंकराच्या सूचनेनंतरही माहेरच्या ओढीने त्या सोहळ्यास गेली. तेथे आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. देवाच्या विनंतीवरूनही शंकरांनी शिरच्छेद केलेल्या दक्ष प्रजापतीस मेषाचे शिर बसवून पुनर्जीवित केले, अशी पौराणिक आख्यायिका आहे.आत्मत्याग दोषामुळे तू कोकिळा होऊन फिरशील, असा पार्वतीला शाप दिल्यामुळे पार्वतीस कोकिळा स्वरूप प्राप्त झाले. या रूपात गणपती, ब्रह्मा, विष्णू यांनी तिची पूजा, उपासना केली. या व्रतामुळे स्त्रियांचे कल्याण व सौभाग्यवृद्धी होईल, असा शंकरांनी वर दिला. गुरू वसिष्ठांच्या उपदेशानुसार शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमालेने प्रथम हे व्रत केले. श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार द्रौपदीने या व्रताचा अंगीकार व प्रसार केला, अशी श्रद्धा आहे.२२५ वर्षांनंतर दुर्मीळ योगअधिक आषाढ मासानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर येणारे कोकिळा व्रत यंदा ३० जुलै ते २९ आॅगस्टदरम्यान साजरे होत आहे. यापूर्वी हे व्रत १९९६ मध्ये साजरे झाले. सिंहस्थ पर्वणीत हे व्रत यापूर्वी शके १७१२ म्हणजे इ.स. १७९० मध्ये आले होते. म्हणजे, तब्बल २२५ वर्षांनंतर हा दुर्मीळ दुग्धशर्करायोग येत आहे. असे करतात व्रत...प्रथम दिवशी संकल्प व विधिवत पूजा करून महिनाभरात उपोषण, नक्त भोजन, भूशय्या, कोकिळा शब्दश्रवण व धार्मिक ग्रंथवाचन, अन्नदान, परोपकार कृत्ये असे नियोजन असते. आपल्या शक्ती व इच्छेनुसार किमान सात किंवा तीन दिवस तरी हे व्रत करावे, असे धार्मिक शास्त्र सांगते. - सुहास शूर, जामदा, ता. चाळीसगाव