शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिवंडीतील १६ शाळांच्या इमारत नूतनीकरणासाठी ३० कोटींचा निधी, रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन पंडित | Updated: November 19, 2022 13:19 IST

महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

भिवंडी :  भिवंडीतील महापालिका शाळांचे रुपडे लवकरच बदलणार असून त्यासाठी सपाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्याद्वारे महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

शेख यांनी २२ जुलै २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिवंडी मनपाच्या शाळांच्या दुरावस्थेची व्यथा मांडत सदर शाळा इमारती जीर्ण झाल्याने दुरुस्ती व नूतनीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता.त्यानुसार शहरातील १६ शाळांची दुरुस्ती आता होणार आहे. ज्यात शांतीनगर पोलीस चौकी मनपा शाळा क्र.९२,९९ व १०० च्या आधुनिकीकरणासाठी ५ कोटी,मनपा शाळा क्र.३४ व ८४ मधील वाचनालय इमारतीचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक, शाळेच्या आवारात सुरक्षा भिंत, उद्यान व मुख्य गेट बांधकामासाठी ४ कोटी रुपये, तसेच बाळा कंपाऊंडमधील शाळा क्र.८६ च्या नूतनीकरणासाठी ३ कोटी रुपये,नवी वस्ती परिसरातील शाळा क्र.६८ च्या नूतनीकरणासाठी १.२५ कोटी रुपये, गैबी नगर शाळा क्र. ६२ व २२ च्या नूतनीकरणासाठी ५ कोटी, नवी वस्ती गौतम कंपाऊंड समोरील शाळा क्र. ५७,९५ च्या नूतनीकरणासाठी १.७५ कोटी, चिश्तिया मशिदीजवळील शाळा क्र.१७ नूतनीकरणासाठी १ कोटी, शाळा क्र.८१ सब्जी मार्केट शांतीनगरच्या नूतनीकरणासाठी १ कोटी,संजय नगर शाळा क्र.१०३ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी, गुलजार नगरच्या मनपा शाळा क्र.७० च्या नूतनीकरणासाठी २ कोटी रुपये, रावजी नगर मनपा शाळा क्र.५४,७३ गणेश नगर,कामतघर मनपा शाळा नूतनीकरणासाठी दीड कोटी रुपये  शाळा क्र.४१ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी आणि नवी वस्ती शाळा क्र.८७ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे एकूण ३० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती शेख यांनी शासनाकडे होती.

आमदार रईस शेख यांच्या या विनंतीचा गांभीर्याने विचार करून ३० कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने आमदार रईस शेख यांना त्यासंदर्भात लेखी पत्र देखील पाठवले असलंयाची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे.तसेच महापालिकेच्या शाळांचे मूल्यांकन तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने भिवंडी महापालिकेला पत्र देखील दिले असून जिल्हा नियोजन समितीने भिवंडी नगरपालिकेला पत्र लिहून पालिकेच्या शाळांचे मूल्यांकन लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे भिवंडी पालिकेच्या शाळांच्या इमारतींचे लवकरच रुपडे पलटणार आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी