शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

संशोधन लाभापासून जिल्ह्याची ३१ गावे वंचित; देशातील ५८ जिल्ह्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:22 IST

विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचा होणार फायदा

सुरेश लोखंडेठाणे : देशातील विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यामध्ये संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोग सतत सुरू आहेत. या संशोधनाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ३१ गावांना देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांची निवड झालेली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे या गावखेड्यांना अद्यापही या तांत्रिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

केंद्र शासनाने उन्नत भारत अभियानाची आखणी केली आहे. याद्वारे देशातील विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोग करून विविध स्वरूपांचे तांत्रिक शोध लावले आहेत. या तंत्रज्ञानाचा लाभ देशातील गावखेड्यांना देणार आहे. यासाठी देशातील ५८ जिल्ह्यांची निवड केली आहे. यामध्ये राज्यातील १३ जिल्हे असून त्यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर या तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी मुरबाड व कल्याण तालुक्यातील ३१ गावांची निवडही जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र, या गावखेड्यांना अद्यापही साधनांचा लाभ झालेला नाही.या संशोधनाचा लाभअभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी संशोधन करून तयार केलेली तांत्रिक साधने गावखेड्यांच्या वापरासाठी दिली जाणार आहे. यामध्ये विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, ग्रामीण उद्योग, शहरी भागांतील विद्युतीकरण, सार्वजनिक वाहतूक, जलसंपदा, स्वच्छता, कुकिंग एनर्जी आदी तांत्रिक साधनांचा समावेश आहे. या संशोधनाचा लाभ त्या-त्या गावांच्या गरजेनुसार करून देण्याचे नियोजन केलेले आहे. यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी बैठक घेऊन जिल्ह्यातील ३१ गावांची निवड केली होती.कल्याण-मुरबाड तालुक्यांतील ही आहेत गावे : जिल्ह्यातील गावांची त्यांच्या गरजेनुसार निवडही केली आहे. यामध्ये मोरणी, चिंचवली, कुसापूर, गेरसे, काकडपाडा, दहागाव, पळसोली, पोई, आगाशी, सोहन अंतडे, अंबे टेंबे, चिरड, अस्कोत, बोरगाव, संगम, कासगाव, मढ, दहीगाव, डेहनोली, उमरी खुर्द, खाटेघर, कळमखंडे, मोहोप, कोंडेसाखरे, काचकोली, न्हाव्हे, तोंडली, पेंढारी, रामपूर, सिंगापूर, पळू आदी गावांचा निवडयादीत समावेश आहे. या गावखेड्यांमध्ये नियोजनानुसार निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.