शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांचा पुन्हा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 01:05 IST

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभेतील १४ गावांनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभेतील १४ गावांनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. दहिसर येथे गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मनसेचे स्थानिक आमदार प्रमोद (राजू) पाटील हे देखील उपस्थित होते. गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.ठाणे तालुक्यातील ही १४ गावे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतात. भौगोलिकदृष्ट्या ती नवी मुंबईजवळ आहेत. काही वर्षांपूर्वी ही गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली. त्यामुळे त्या गावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आली. परंतु, विकास रखडल्याने ग्रामपंचायत नको. गावांचा महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी २०१५ पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे.>आमदारांचाही पाठिंबानवी मुंबई महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रभागरचनाही जाहीर झालेली असून, या १४ गावांच्या वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. मात्र, यावेळीही निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित असलेले आमदार पाटील यांनीही बहिष्काराच्या निर्णयाला पाठिंबा दिला.