शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उल्हासनगरात २९४ धोकादायक इमारती; खाली करण्याच्या नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: May 12, 2023 17:25 IST

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ...

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्याखाली करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

 उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. महापालिकेने सर्वेक्षण केलेल्या इमारती पैकी २९४ इमारती धोकादायक घोषित करून, त्यांना नोटिसा देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. इमारती मधील हजारो नागरिक या नोटिसेने हवालदिल झाले. प्रभाग समिती क्रं-१ मध्ये सर्वाधिक ९७ इमारती धोकादायक असून प्रभाग समिती क्रं-२ मध्ये ७१, प्रभाग समिती क्रं-३ मध्ये ७३ तर प्रभाग समिती क्रं-४ मध्ये ५३ इमारती धोकादायक आहेत. एकून २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक तर ५० इमारती खाली करून त्याची दुरुस्ती सुचविली आहे. २१४ इमारतीला खाली न करता दुरुस्ती करण्यासाज सूचवून असून २२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले.

 शहरातील २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्या खाली करून, त्यांची वीज व पाण्याची जोडणी खंडित केली. मात्र ज्या ५० इमारती खाली करून त्यांची दुरुस्ती  सुचविली आहे. त्या इमारती मध्ये शेकडो कुटुंब असून त्या खाली कश्या करायच्या असा प्रश्न महापालिके समोर पडला आहे. दरम्यान १० वर्ष जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास, बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाने मंजूर केलेल्या ३० कोटीच्या निधीतून ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची घोषणा नुकतीच आयुक्त अजीज शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022