शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

उल्हासनगरात २९४ धोकादायक इमारती; खाली करण्याच्या नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: May 12, 2023 17:25 IST

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ...

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्याखाली करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

 उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. महापालिकेने सर्वेक्षण केलेल्या इमारती पैकी २९४ इमारती धोकादायक घोषित करून, त्यांना नोटिसा देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. इमारती मधील हजारो नागरिक या नोटिसेने हवालदिल झाले. प्रभाग समिती क्रं-१ मध्ये सर्वाधिक ९७ इमारती धोकादायक असून प्रभाग समिती क्रं-२ मध्ये ७१, प्रभाग समिती क्रं-३ मध्ये ७३ तर प्रभाग समिती क्रं-४ मध्ये ५३ इमारती धोकादायक आहेत. एकून २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक तर ५० इमारती खाली करून त्याची दुरुस्ती सुचविली आहे. २१४ इमारतीला खाली न करता दुरुस्ती करण्यासाज सूचवून असून २२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले.

 शहरातील २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्या खाली करून, त्यांची वीज व पाण्याची जोडणी खंडित केली. मात्र ज्या ५० इमारती खाली करून त्यांची दुरुस्ती  सुचविली आहे. त्या इमारती मध्ये शेकडो कुटुंब असून त्या खाली कश्या करायच्या असा प्रश्न महापालिके समोर पडला आहे. दरम्यान १० वर्ष जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास, बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाने मंजूर केलेल्या ३० कोटीच्या निधीतून ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची घोषणा नुकतीच आयुक्त अजीज शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022