शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

29 मनोरुग्णांना मिळाली सुट्टी, जागृती संस्थेत पुनर्वसन; स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पंखांना देणार बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:05 IST

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठाणे : नातेवाइकांनी नाकारलेल्या, नातेवाईक सापडत नसलेल्या, कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुटी मिळाली आहे. कुटुंबाने आधार दिला नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळाला आहे.  

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या ५२ मनोरुग्णांची ‘जागृती’ पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जाईल तर मानसिक आजारातून बरे झालेल्या; पण पॅरालिसिस, दिव्यांग अशा इतर आजाराने त्रस्त असलेल्या ३५ जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. तेथे त्यांची देखभाल करण्याकरिता कर्मचारी तैनात असतील. 

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात १५ जणांना तर आता २९ जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. अन्य जणांची टप्प्याटप्प्याने तपासणी करून पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

कलागुणांना दिला जातो वाव१८ ते ५५ वयोगटातील २९ पैकी १४ महिला, तर १५ पुरुषांना ‘जागृती’मध्ये पाठवले आहे. दिव्यांग, गतिमंद मनोरुग्णांसाठी विशेष पुनर्वसन केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. मनोरुग्णालयातून या केंद्राची नावे पाठवली असली तरी शासन स्तरावर योग्य ती पुनर्वसन केंद्राची पडताळणी करून त्यांना ठेवले जाईल, असे डॉ. मुळीक म्हणाले. तेथे त्यांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्यांना वाव देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले जाते. 

सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण -    सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण असून पैकी ४९१ पुरुष, तर २९४ स्त्री मनोरुग्णांची संख्या आहे. यातील किती तरी मनोरुग्ण हे औषधोपचाराने बरे झाले आहेत. -    ‘मेंटल हेल्थ केअर’ कायद्यानुसार २०१७ नुसार मानसिकदृष्ट्या बरे झालेल्यांना मनोरुग्णालयात ठेवता येत नाही; परंतु काहींचे नातेवाईक असून स्वीकारत नाही तर काहींचे नातेवाईक सापडत नाही, अशा रुग्णांचे करायचे काय, असा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्यांना शासनाने पुनर्वसन केंद्राची वाट मोकळी करून दिली. 

 

टॅग्स :thaneठाणे