शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

29 मनोरुग्णांना मिळाली सुट्टी, जागृती संस्थेत पुनर्वसन; स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पंखांना देणार बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:05 IST

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठाणे : नातेवाइकांनी नाकारलेल्या, नातेवाईक सापडत नसलेल्या, कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुटी मिळाली आहे. कुटुंबाने आधार दिला नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळाला आहे.  

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या ५२ मनोरुग्णांची ‘जागृती’ पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जाईल तर मानसिक आजारातून बरे झालेल्या; पण पॅरालिसिस, दिव्यांग अशा इतर आजाराने त्रस्त असलेल्या ३५ जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. तेथे त्यांची देखभाल करण्याकरिता कर्मचारी तैनात असतील. 

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात १५ जणांना तर आता २९ जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. अन्य जणांची टप्प्याटप्प्याने तपासणी करून पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

कलागुणांना दिला जातो वाव१८ ते ५५ वयोगटातील २९ पैकी १४ महिला, तर १५ पुरुषांना ‘जागृती’मध्ये पाठवले आहे. दिव्यांग, गतिमंद मनोरुग्णांसाठी विशेष पुनर्वसन केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. मनोरुग्णालयातून या केंद्राची नावे पाठवली असली तरी शासन स्तरावर योग्य ती पुनर्वसन केंद्राची पडताळणी करून त्यांना ठेवले जाईल, असे डॉ. मुळीक म्हणाले. तेथे त्यांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्यांना वाव देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले जाते. 

सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण -    सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण असून पैकी ४९१ पुरुष, तर २९४ स्त्री मनोरुग्णांची संख्या आहे. यातील किती तरी मनोरुग्ण हे औषधोपचाराने बरे झाले आहेत. -    ‘मेंटल हेल्थ केअर’ कायद्यानुसार २०१७ नुसार मानसिकदृष्ट्या बरे झालेल्यांना मनोरुग्णालयात ठेवता येत नाही; परंतु काहींचे नातेवाईक असून स्वीकारत नाही तर काहींचे नातेवाईक सापडत नाही, अशा रुग्णांचे करायचे काय, असा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्यांना शासनाने पुनर्वसन केंद्राची वाट मोकळी करून दिली. 

 

टॅग्स :thaneठाणे