शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

27 गावांतील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार, जागा तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:32 IST

सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली.

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावात भीषण पाणी टंचाई असून ती सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली. अधिका-यांना जागेचा ताबा महापालिकेकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.सागाव येथील एमआयडीसीच्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये जलकुंभ बांधल्यास येथील बारा ते पंधरा गावांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल मात्र जागेअभावी व जलकुंभ नसल्याने सध्या २७ गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी भोईर यांनी घेऊन जलकुंभ बांधण्याकरीता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सागाव येथील ३५०० स्क्वेअर मी. जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.तसेच अमृत योजनेतून महापालिकेने तातडीने जलकुंभ बांधून संप व पंप बांधणी करावी अशा सूचनाही उद्योगमंत्र्यानी केल्या आहेत. यामुळे २७ गावातील सागाव, सागर्ली, नांदिवली, स्टार कॉलनी, पी अँड टी कॉलनी, संघवी गार्डन, संजय नगर, चेरा नगर, मानपाडा, माणगाव, सोनार पाडा, आजदे, भोपर, देसले पाडा, नवनीत नगर या विभागाला पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. या बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, एमआयडीसी अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, उपअभियंता मनोज कुलकर्णी, कल्याण डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता राजीव पाठक, योगेश म्हात्रे उपस्थित होते.