शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

२७ गावे वगळली, तर न्यायालयात

By admin | Updated: March 21, 2017 01:56 IST

संघर्ष समितीच्या नेत्यांच्या दबावाखातर जर २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळली, तर न्यायालयात दाद मागू

कल्याण : संघर्ष समितीच्या नेत्यांच्या दबावाखातर जर २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळली, तर न्यायालयात दाद मागू असा इशारा देत शिवसेनेने ही गावे वगळण्याचा आपला विरोध तीव्र केला आहे. या गावातील नागरिकांना पालिकेतून बाहेर पडायचे नाही. पण नेत्यांनी या गावांत अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती नियमित करण्यासाठीच या नेत्यांना स्वतंत्र नगरपालिका हवी आहे, असा आरोपही शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांनी केला आहे. या गावातील बेकायदा बांधकामांना आमचा पाठिंबा नाही, असे संघर्ष समितीतर्फे स्पष्ट केले जात असले, तरी ही बांधकामे वाचवण्याचे काम समितीकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समितीला स्वतंत्र नगरपालिका का हवी आहे, याचे स्पष्टीकरण देताना बाबर म्हणाल्या, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन झाल्यावर बेकायदा बांधकामे सरकारकडून नियमित केली जातील. त्यासाठीच त्यांना गावे वेगळी करून हवी आहेत. या गावातील नागरिकांना स्वतंत्र नगरपालिका नको आहे. त्यांना वेगळे व्हायचे नाही. त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेतच राहायचे आहे. ही फक्त नेत्यांची गरज आहे. राज्य सरकारला गावे वेगळी करायची होती, तर ती त्यांनी महापालिकेत समाविष्टच का केली. आत्ता पुन्हा वेगळी करुन काय साध्य होणार आहे. राज्य सरकारने संघर्ष समितीच्या दबावाला बळी पडून गावे वेगळी करण्याचे राजकारण केले, तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा बाबर यांनी दिला. (प्रतिनिधी)निवडणुकीतील पाठिंबा संघर्ष समितीच्या मूळावर : कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुका होऊन भाजप, शिवसेना, मनसे, अपक्ष आणि बसपाचे २१ नगरसेवक निवडून आले. या गावातील नागरिकांना निवडणुकीची प्रक्रियाच मान्य नसती, तर त्यांनी मतदान करुन नगरसेवक निवडून दिले नसते. बहिष्कार टाकला असता. पण असे झाले नाही. २७ गावातून शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले. मनसेचा एक, बसपाचा एक आणि भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. निवडणुकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने भाजपाला पाठिंबा दिला होता. संघर्ष समिती आधी बहिष्कार टाकणार होती. त्यानंतर ती भाजपच्या वळचणीला गेली. त्यांची ही कृतीच त्यांच्या मूळावर आली आहे. निवडणुका पार पडल्यानंतर त्यांनी पुन्हा गावे वगळण्याची मागणी केली. नगरसेवकांनी प्रभागात महापालिकेच्या निधीतून विकासकामे सुरु केली आहेत. या गावातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा भाजप नगरसेविका रविना माळी यांनी उपस्थित केला, तर गावातील पाणी बेकायदा बांधकामांसाठी वापरले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करुनपालिका मुख्यालयावर हंडा- कळशी मोर्चा काढला होता.