शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

२७ गावांत पालकमंत्र्यांची परीक्षा तर समितीची कसोटी

By admin | Updated: October 30, 2015 23:52 IST

कल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय

अरविंद म्हात्रे, चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय, सपा, बसपा अशा सर्वपक्षीयांचे नेतृत्व करणारी संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात फेस टू फेस सामना रंगला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३२ वर्षांचा बहिष्कार फोडल्याचा राग धरून संघर्ष समिती चवताळल्यागत शिवसेनेला शह देण्यासाठी शड्डू ठोकून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. तर, संघर्ष समितीचीही कसोटी लागलेली आहे.मुख्यमंत्र्यांसह मंत्री,आमदार, खासदार यांनी २७ गावांत हजेरी लावून समितीच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही दिली. यामुळे २७ गावे समिती बळकट झाली असली तरी खुद्द पालकमंत्री रात्री २७ गावांत घरोघरी प्रचारास फिरल्याने शिवसेनेतही उत्साह बघायला मिळाला. त्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. तर, संघर्ष समितीने प्रचारात त्यांनाच टार्गेट करून भूमिपुत्रांच्या हिताआड आल्याचा आरोप केला. यामुळे २७ गावांचा प्रचारही आज (३० आॅक्टो.) संपला असून समितीने घरोघरी जाऊन मतदारांना शिवसेनेने २७ गावांना वेठीस धरल्याचा प्रचार केला. संघर्ष समितीला राजकीय लाभ देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. समितीच्या प्रचारामुळे पालकमंत्र्यांना २७ गावांत घरोघरी मते मागण्यासाठी जावे लागले. येथे शिवसेनेची एक उमेदवार आधी बिनविरोध आलेली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून २७ गावांत नियोजनबद्ध विकास नाही. यामुळे समस्याग्रस्त ठरलेल्या या गावांसाठीही ही निवडणूक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. १ तारखेला होणाऱ्या मतदानानंतर जनता कोणाच्या बाजूने कौल देते, यावर त्यांचे भवितव्य अधिक अवलंबून आहे.