शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

२७ गावांच्या मतदानाची उत्सुकता

By admin | Updated: October 28, 2015 23:17 IST

१९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

चिकणघर : १९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९८३ च्या आॅक्टोबरला तत्कालीन कल्याण महापालिकेची स्थापना करताना जवळच्या एकूण ८१ खेड्यासोबतच २७ गावांचाही मनपात समावेश झाल्यापासून २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने गावांच्या समावेशाला विरोध करून रतन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने केली. यानंतर १९ वर्षानंतर जुलै २००२ ला ही गावे शासनाने वगळून पंचायत राज आणले. मात्र, पुन्हा एकदा या गावांचा कारभार आॅगस्ट २००६ ला एमआयडीसीकडे सुपूर्द केल्याने संघर्ष समितीला आयतेच आंदोलनाचे कोळीत मिळाले. यावर कळस म्हणून १ जून २०१५ पासून सरकारने पुन्हा गावांना मनपात समावेश केला. मात्र लोकांचा विरोध आणि खरी हकीकत कळल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चुक सुधारण्याचे सांगून ७ सप्टेंबर २०१५ ला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. मात्र निवडणुकीच्या काळात गावे वगळण्याची अधिसूचना आयोगाने धुडकावल्याने अखेर २७ गावांसह निवडणूक आहे.