शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

२७ गावांत पुन्हा पाणी पेटले

By admin | Updated: March 11, 2016 02:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांत ६० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. असे असतानाही या गावांत महापालिका पाण्याचे टँकर पुरवत नाही

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांत ६० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. असे असतानाही या गावांत महापालिका पाण्याचे टँकर पुरवत नाही. इतकेच काय, तर बोअरवेल्सची दुरुस्ती आणि विहिरींच्या स्वच्छतेकडेही प्रशासन लक्ष देत नाही, अशी ओरड स्थायी समिती सदस्यांनी गुरुवारी सभेत केली. विशेष म्हणजे महापालिकेने आपत्कालीन पाणीटंचाईच्या आराखड्याची अंमलबजावणीही अजून केलेली नाही, असे सदस्यांनी सांगितले. या प्रकरणी सभापतींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते. दरम्यान, उपायुक्त दीपक पाटील शुक्रवारी २७ गावांत पाहणी करून पाणीटंचाईचा आढावा घेतील, असे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले.प्रभाग क्रमांक ११३ मधील शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे, भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील आणि हर्षली थविल यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेच्या अन्य हद्दीपेक्षा २७ गावांत पाणीकपात जास्त आहे. धरणात पाणी नसल्याने कपात लागू असल्याचे सदस्यांनी मान्य केले. मात्र, एमआयडीसीकडून ६० टक्के कपात लागू झाली आहे. यापूर्वी हीकपात ३५ टक्के होती. त्यामुळे गावांतील पाण्याची स्थिती बिकट आहे. गावातील बोअरवेल्सची दुरुस्ती होत नाही. टँकर मागवूनही पालिका ते पुरवत नाही, अशी व्यथा म्हात्रे यांनी मांडली. गाव परिसरातील इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वस्तीला पाणी दिले जात नाही. हा दुजाभाव आहे. पाण्याचे नियोजन केले जात नाही. सदस्यांनी तक्रारी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही, असे पाटील म्हणाले. अधिकारीही गावांत फिरकत नाहीत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा हे सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप सदस्यांनी केला. या मुद्द्यांवरून सभापती संदीप गायकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेने गावांसाठी आपत्कालीन पाणीटंचाईकृती आराखडा तातडीने मंजूर केला आहे. त्यासाठी २५ कोटींचा निधीही देऊ केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही, असे सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदावरचपाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बोअरवेल्स खोदणे, नादुरुस्त बोअरवेल्सची दुरुस्ती, विहिरींची स्वच्छता, पाणी साठवण्यासाठी टाक्या बसवणे, आदी कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे अजून सुरू झालेली नाहीत. ‘त्या’ दिवशीही टँकर बंदमहापालिकेने पाणीपुरवठ्याचे कंत्राट खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. महापालिकेने या टँकरद्वारे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करायचा आहे. एका टँकरपोटी महापालिका २ हजार ३९० रुपये कंत्राटदाराला मोजते. महापालिकेकडे १५ टँकर होते. त्यात, आणखी दोनची भर पडली आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद असतो, त्या दिवशी टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही.पाणीबिलाच्या वसुलीची सक्ती अयोग्यमहापालिका नागरिकांना पाणी देत नसेल, तर टंचाईच्या काळात पाणीबिल वसुलीसाठी सक्ती करणे योग्य नाही. पावसाळ्याश्चात पाणीबिल वसुलीची सक्ती करावी, असे सभापती गायकर यांनी प्रशासनाला सूचित केले आहे.