शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 16:52 IST

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे. 

ठळक मुद्दे २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने कवी संमेलन विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना पुरस्कार

ठाणे : सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या 'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी, २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे २६ व्या भव्य राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अड. बी.एल.शर्मा व सह-संयोजक समाजसेवकी-उद्योगपति अरुण जोशी हे आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. 

    मागील २५ वर्षांपासून सातत्याने दरवर्षी होणा-या सदर कार्यक्रमात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीचे कवी ठाण्यात येत असून या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना संस्थेतर्फे प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. या पुरस्कारांमध्ये साहित्य-पत्रकारितेसाठी 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणास लावून अदभूत अशी शूरविरता दाखविणा-या व्यक्तीस 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' आणि आपल्या अतुल्य कलागुणाने महाराष्ट्राच्या नावास देश-परदेशात लौकिक मिळवून देणा-या व्यक्तीस 'छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' चा समावेश आहे, पत्रकार परिषदेत अशी माहिती देत अड शर्मा यांनी म्हटले की, यंदाच्या सत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार (नवभारत टाइम्स) विमल मिश्र यांना 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणार्थ कश्मीर येथे अतिरेकींचा सामना करताना भारतमातेच्या सेवेत आपले प्राण अर्पित करणारे लष्कर दलाचे शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' तर नामवंत ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांना 'छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. 

      समारंभाचे उद्घाटन बंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति कमळकिशोर तातेड व न्यायमूर्ति मकरंद कर्णिक यांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलनाने करण्यात येईल. या प्रसंगी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (आयपीएस) व कोकण निभागिय विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज (आयपीएस) हे विशेष पाहुणे तसेच ठाणे जिल्हा वकिल संघटनेचे अध्यक्ष अड. प्रकाश भोसले, 'राजस्थान पत्रिका' (मुंबई) चे संपादक डॉ. उरुक्रम शर्मा व ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक अजिताभ बच्चन यांची कार्यक्रमात सम्माननिय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. 

    सदर सोहळ्यात होणा-या राष्ट्रिय कवी संमेलनाचे सुत्र-संचालन ज्येष्ठ विनोदसम्राट कवी सत्यनारायण सत्तन हे करणार असून या प्रसंगी पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे (रायपुर), प्रताप फौजदार (आगरा), आशीष 'अनल' (लखीमपुर-खीरी), गजेंद्र प्रियांशु (बाराबंकी), गौरव चौहान (इटावा), गौरव शर्मा (मुंबई) आणि डॉ. भुवन मोहिनी (उज्जैन) आदी मान्यवर कवी आपापल्या काव्यरचना सादर करतील.     

    कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील महेश जोशी, डॉ. सुशिल इन्दोरिया, अड. सुभाष झा, महेश बागड़ा, अशोक पारेख, राजेंद्र दाधीच, ए. एन. रुबिन, राजेंद्र शर्मा यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आलेल्या या समारंभात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, शेवटी असे आवाहन शर्मा यांनी लोकांना केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक