शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बरे झालेल्या 260 मनोरुग्णांना कुटुंबीयांनी सोडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:12 IST

मानसिक आजार झालेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे गरीब कुटुंबीयांना परवडत नाही. शिवाय, शासन आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर मोठा ताण असतो. अशावेळी १०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार वाटतो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानसिक आजार अधिक प्रमाणात बळावल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक त्यांना उपचारासाठी ठाणे येथील  जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करत असतात. मात्र, आजारातून बाहेर पडल्यानंतर या रुग्णांचे नातलग त्यांना घेण्यासाठी येत नाहीत. गेल्या चार वर्षांत अशा रुग्णांची संख्या २६० झाली असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मात्र, या रुग्णांचे सामाजिक संस्थांच्या मदतीने पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

मानसिक आजार झालेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे गरीब कुटुंबीयांना परवडत नाही. शिवाय, शासन आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर मोठा ताण असतो. अशावेळी १०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार वाटतो. त्यामुळे या रुग्णालयात राज्याच्या विविध भागांतून रुग्ण येतात.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या चार वर्षात २६० रुग्ण बरे होऊनही त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी वाऱ्यावर सोडले आहे. त्यामध्ये २०२१ - ५०, २०२२- ६०, २०२३ - ८५, २०२४ - ६५ रुग्णांचा समावेश आहे.  मानसिक उपचाराचा कालावधी मोठा असतो. नातेवाईक मनोरुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास येतात त्यावेळी चुकीचा पत्ता देतात, तर काहीजण पुढले काही दिवस रुग्णास भेटावयास येतात. कालांतराने या भेटी बंद होतात. मोबाइल नंबर बदलला जातो. उपचार करताना दिलेला पत्ता बदललेला असतो. अशावेळी रुग्णांना कुठे पाठवायचे हा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडतो. 

वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठवताना रुग्णालय प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काहीवेळा कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे अनेकवेळा नातेवाईक त्या रुग्णाला परत घेण्यास नकार देतात. तसेच अनेक रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतात. अशावेळी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्याची व्यवस्था काही वर्षांपासून केली आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून नवीन कायद्यानुसार मानसिक आजारातून बरे झालेल्या मात्र नातेवाईक न सापडलेल्या रुग्णांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत बरे झालेल्या २२० रुग्णांना तळोजा येथील जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे. रुग्णालयात मानसिक आजारातून बरे झालेले, मात्र त्यासोबत अन्य सहव्याधी असलेल्या (ऐकू न येणारे किंवा अन्य प्रकारचे दिव्यांग) ६३ रुग्णांना विशेष पुनर्वसन केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णाच्या नातेवाइकांचा पत्ता सापडला तर त्यांना नातेवाइकांकडे सोपविण्यात येते. - डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालय