शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षण विभागात 26 टक्के, तर ‘आरोग्य’ची 49 टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:25 IST

रिक्त पदे त्वरित भरा : जि.प. उपाध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना साकडे 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्षे पूर्ण झाली असूनही आजही जिल्हा परिषद विभागात रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्याच्या आदिवासी ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षण या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात, तसेच कुपोषणाच्या घटनेने दिलेला अशिक्षितपणा मिटविता येईल, जनसामान्य आदिवासी माणसांचा व सर्वसामान्यांना हक्क मिळविण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभागातील ६० ते ७० टक्के पदे तत्काळ भरण्यात यावीत, जेणेकरून आदिवासी ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना उत्तम आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे पत्र जि. प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्य सचिवांना दिले आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर अवलंबून असते. आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने शाळाबाह्य वर्ग सुरू केले आहेत. मात्र, शिक्षक संख्या अपुरी आहे. यामुळे शासनाने शिक्षकांची संख्या नियमित केली, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची वाढेल आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल.

जिल्ह्यामध्ये आराेग्य सेवेचा बाेजवाराnदुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला बघावायस मिळत आहे. जिल्ह्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना ॲम्ब्युलन्स मिळत नाहीत. योग्य वेळी औषधेही मिळत नाहीत. nपरिणामी अशा गरजवंत रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतो. अशा शेकडो घटना जव्हार आणि मोखाडासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात घडलेल्या आहेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.