शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

शिक्षण विभागात 26 टक्के, तर ‘आरोग्य’ची 49 टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:25 IST

रिक्त पदे त्वरित भरा : जि.प. उपाध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना साकडे 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्षे पूर्ण झाली असूनही आजही जिल्हा परिषद विभागात रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्याच्या आदिवासी ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षण या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात, तसेच कुपोषणाच्या घटनेने दिलेला अशिक्षितपणा मिटविता येईल, जनसामान्य आदिवासी माणसांचा व सर्वसामान्यांना हक्क मिळविण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभागातील ६० ते ७० टक्के पदे तत्काळ भरण्यात यावीत, जेणेकरून आदिवासी ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना उत्तम आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे पत्र जि. प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्य सचिवांना दिले आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर अवलंबून असते. आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने शाळाबाह्य वर्ग सुरू केले आहेत. मात्र, शिक्षक संख्या अपुरी आहे. यामुळे शासनाने शिक्षकांची संख्या नियमित केली, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची वाढेल आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल.

जिल्ह्यामध्ये आराेग्य सेवेचा बाेजवाराnदुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला बघावायस मिळत आहे. जिल्ह्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना ॲम्ब्युलन्स मिळत नाहीत. योग्य वेळी औषधेही मिळत नाहीत. nपरिणामी अशा गरजवंत रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतो. अशा शेकडो घटना जव्हार आणि मोखाडासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात घडलेल्या आहेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.