शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

२५४ कामगारांना मिळणार किमान वेतन

By admin | Updated: May 13, 2017 00:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील २५४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेतल्यानंतरही तुटपुंजा पगार मिळत होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत या सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन सुरू करावे, अशी सूचना केली. त्याची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याचे लेखी आदेश दिले.त्यासंदर्भात गुरुवारी मुंबईत चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. त्या वेळी या कामगारांना मिळणारे सध्याचे वेतन हे तुटपुंजे आहे. वाढत्या महागाईसमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे, असे चव्हाण यांनी सहायक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार, त्यांनीही वस्तुस्थितीचा अभ्यास करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना कामगार कायद्याच्या अधिकाराचा भंग करू नका, असे खडे बोल सुनावले. तसेच या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत किमान वेतन का मिळाले नाही, असा सवाल करत संबंधितांवर कामगार कायद्याचा भंग केला म्हणून फौजदारी गुन्हे दाखल का करू नये, असा सवाल केला. तसेच कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही लेखी आदेश दिले. तसे पत्र केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांना तातडीने पाठवण्यात आले.