शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

२५४ कामगारांना मिळणार किमान वेतन

By admin | Updated: May 13, 2017 00:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील २५४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेतल्यानंतरही तुटपुंजा पगार मिळत होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत या सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन सुरू करावे, अशी सूचना केली. त्याची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याचे लेखी आदेश दिले.त्यासंदर्भात गुरुवारी मुंबईत चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. त्या वेळी या कामगारांना मिळणारे सध्याचे वेतन हे तुटपुंजे आहे. वाढत्या महागाईसमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे, असे चव्हाण यांनी सहायक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार, त्यांनीही वस्तुस्थितीचा अभ्यास करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना कामगार कायद्याच्या अधिकाराचा भंग करू नका, असे खडे बोल सुनावले. तसेच या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत किमान वेतन का मिळाले नाही, असा सवाल करत संबंधितांवर कामगार कायद्याचा भंग केला म्हणून फौजदारी गुन्हे दाखल का करू नये, असा सवाल केला. तसेच कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही लेखी आदेश दिले. तसे पत्र केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांना तातडीने पाठवण्यात आले.