शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२५००० बोगस रिक्षा बुलडोझरखाली चिरडा; कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ झाला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:19 IST

ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

ठाणे : ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.सध्या सुरू असलेल्या रिक्षा परमिटवाटपामुळे जो तो रिक्षामालक होऊ पाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फळीच संपुष्टात आली आहे. त्यातच, परमिट घेण्यासाठी रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने भविष्यात कर्जबाजारी होऊन त्यांच्यावरही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येईल. त्यामुळे लोकसंख्या लक्षात घेऊन परमिटचे वाटप करावे, असे त्यांनी सुचवले.ओला आणि उबेर यांच्यामुळे रिक्षावाल्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत पेणकर यांनी त्या कंपन्या बेकायदा खाजगी प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच त्यांना कोणतेही कायदे, नियमांचे बंधन नाही. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे आणि मगच परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काल रिक्षा बॅज घेतलेल्या आणि वास्तव्याचा दाखला नसलेल्यांनाही रिक्षा परमिट मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. बॅज मिळाल्यानंतर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर परमिटचे वाटप करावे तसेच रिक्षा आणल्यावर ते द्यावे, अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सीचे १० टक्के क्लेम (इन्शुरन्स) विमा पॉलिसी कंपनी यांच्याक डे होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, राज्य परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा क रणार आहोत. तरीसुद्धा त्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला.अडचणींवर झाली चर्चाठाणे जिल्हा कोकण विभाग आणि एमएमआरडीए क्षेत्रातील आॅटो रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध अडचणी- समस्या, शासनाने रिक्षा, टॅक्सी मुक्त (खुले) केलेले परवाने बंद करावेत किंवा ५ ते १० वर्षांपर्यंत स्थगिती द्यावी, यासंदर्भात ठाण्यात रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा हा मेळावा झाला.न जुमानणारी पिढीरिक्षा चालवण्याच्या व्यवसायात येणे सोपे असल्याने दररोज ५० ते १०० जण त्यात उतरत असल्याने एकीकडे त्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये १६ ते १७ वर्षीय मुलांचाही समावेश आहे. पण ही मंडळी कोणत्याही युिनयनला जुमानत नाही. नियम पाळत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे