शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२४,३७५ जॉबकार्ड कुटुंब बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:00 IST

विक्रमगडमध्ये रोजगार हमीची फक्त ७० कामे; प्रशासन म्हणते ग्रा.पं.स्तरावरुन प्रस्तावच नाही

- संजय नेवे विक्रमगड : मागेल त्याला काम आणि काम करील त्याला दाम या तत्वाखाली सुरु असलेली महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार योजना विक्रमगड तालुक्यात तोकडी पडली आहे. तब्बल २४,७९५ येवढ्या मजूर कुटुंबाची नोंद असताना केवळ ४२० मजुर कुटुंबाना रोजगार मिळाला असून केवळ ७० ठिकाणी कामे सुरु आहेत. दरम्यान ग्रामपंचायतस्तरावरुन कोणतेही प्रस्ताव न आल्याने रोजगार हमीची कामे निघाली नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.महात्मा गाधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाडयासह मजूराना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतस्तरावर असल्याने शंभर दिवस पुरेल एवढे काम मंÞजुर करून मागेल त्याला काम या ब्रीदवाक्याने तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत पैकी १५ ते २० ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यापैकी डोल्हारीखु, सवादे, कासा, साखरे, दादडे, वेढेचरी, बोराडे, मोहो आंबेघर, खडकी केगवा या ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाची व शोषखड्ड्याची एकुण ७० कामे सुरू आहेत. मात्र, इतर ग्रामपंचायती अंतर्गत अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराना काम शोधण्यासाठी फिरावे लागत आहेत.रोजगार हमीची कामे वेळेत सुरू झाली तरच मजूरांचे स्थालांतर होणार नाही व रोजगार हमीची कामे देखील होतील. तसेच, इतर यंत्रणेची कामे सुरू नसल्याने मजूरानी कामाची मागणी केली आहे. तालुक्यात काही जणांना रोजगार मिळाला असून बाकीच्या मजुरानी काय करायचे असा सवाल राजा गहला यांनी केला आहे.या घरकुलाच्या कामामुळे फक्त ४२० मजूर कुटुंबाना काम मिळाले आहे. असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे बाबासाहेब गायकवाड यांनी दिली. त्यामुळे हजारो हातांना गरज असूनही काम नसल्याची स्थिती आहे.तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे सुरू करणे आवश्यक असताना कामे सुरू होत नाहीत त्यामुळे मजूराना स्थंलातर करावे लागत आहे. शेतीची कामे संपली असल्याने बिकट स्थिती आहे.

टॅग्स :palgharपालघर