शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर; प्रदूषण दूर होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:13 IST

सामाजिक पर्यावरणवादी संस्थांचा सवाल

कल्याण-उल्हास नदीत विविध रासायनिक कंपन्याकडून योग्य प्रकारे प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी नदी पात्रत सोडले जाते. तसेच नदी पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. या विविध कारणामुळे नदी प्रदूषित झाली. हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक पर्यावरणवादी संस्थांचा लढा सुरु आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहिर केले आहे. याचे सामाजिक संस्थांनी स्वागत केले असले तरी इतक्या कमी निधीत प्रदूषणाचा प्रश्न सुटणार का असा सवाल या संस्थांच्या वतीने करण्यात आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच जिल्हा वार्षिक योजनेकरीता 445 कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी दिला आहे. यासाठी ठाणो जिल्ह्यातून जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी तीन प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. त्यात उल्हास नदी प्रदूषण दूर करण्याचा विषयही होता. उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी त्यातून प्राप्त झाला आहे.  उल्हास नदी पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी, रासायानिक सांडपाणी सोडले जाते. नदी प्रदूषणाच्या विरोधात मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी तीन वेळा नदी पात्रत  ३६ दिवस बेमुदत उपोषण केले होते.  

त्याचबरोबर उल्हास नदी बचाव कृती समितीचे  रविंद्र लिंगायत यांनी ही आंदोलन केली आहेत. वनशक्ती या संस्थेची याचिका हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. जलपर्णीचा विळखा कायम आहे. चंद्रशेखर भडसावळे यांच्या संस्थेच्या माध्यमातून जलपर्णी हटविण्यासाठी ग्लायफोसेटची फवारणी केली गेली. जलपर्णी दूर होत असली तरी ग्लायफोसेट घातक आहे. त्याऐवजी दुस:या जैविक  पद्धतीचा वापर करावा असा मुद्दा पुढे येत आहे. जलपर्णी नदी पात्रत पुन्हा निर्माण न होता समूळ नष्ट व्हावी याकडे निकम यांनी लक्ष वेधले आहे. दिलेला निधी अत्यल्प असून किमान सुरुवात तरी झाली याविषयी विविध संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री राजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे 211 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याला अद्याप केंद्राकडून मंजूरी मिळालेली नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर