शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

२३५ गावांना टँकरने पाणी; शहरात वाढीव पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:44 IST

पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला.

ठाणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातून टँकरची मागणी झाल्यास ती जलदगती पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शहरी भागांत नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पाणीकपातीत वाढ होणार नसल्याचे बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांची माहितीही घेतली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३५ गावे आणि पाड्यांसाठी ३६ टॅँकर सुरू आहेत. त्यामध्ये शहापूर तालुक्यात २९ तर मुरबाड तालुक्यात ७ टॅँकरचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाण्याची पातळी १२० फुटांच्याही खाली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी ज्या गावातून अथवा पाड्यातून टँकरची मागणी येईल, ती गावे व पाड्यांची तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ पाहाणी करून प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात यावा अशा सूचना केल्या.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेलांना मंजुरी दिली आहे. विंधन विहीरी, नवीन नळपाणीयोजना आठवडाभरात सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर जे भाग उंचावर आहेत, त्या ठिकाणी मोठे टँकर जाऊ शकत नसतील तर तेथे छोटे टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधिकाºयांना सांगितले.शहरी भागात तूर्तास मुबलक पाणी : जलसंपदा व एमआयडीसीकडून जिल्ह्यातील पाण्याची स्थिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. त्यानुसार, शहरी भागातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिकांना १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू केलेल्या पाणीकपातीत वाढ करण्यात येणार नाही. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे