शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

२३५ गावांना टँकरने पाणी; शहरात वाढीव पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:44 IST

पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला.

ठाणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातून टँकरची मागणी झाल्यास ती जलदगती पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शहरी भागांत नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पाणीकपातीत वाढ होणार नसल्याचे बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांची माहितीही घेतली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३५ गावे आणि पाड्यांसाठी ३६ टॅँकर सुरू आहेत. त्यामध्ये शहापूर तालुक्यात २९ तर मुरबाड तालुक्यात ७ टॅँकरचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाण्याची पातळी १२० फुटांच्याही खाली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी ज्या गावातून अथवा पाड्यातून टँकरची मागणी येईल, ती गावे व पाड्यांची तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ पाहाणी करून प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात यावा अशा सूचना केल्या.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेलांना मंजुरी दिली आहे. विंधन विहीरी, नवीन नळपाणीयोजना आठवडाभरात सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर जे भाग उंचावर आहेत, त्या ठिकाणी मोठे टँकर जाऊ शकत नसतील तर तेथे छोटे टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधिकाºयांना सांगितले.शहरी भागात तूर्तास मुबलक पाणी : जलसंपदा व एमआयडीसीकडून जिल्ह्यातील पाण्याची स्थिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. त्यानुसार, शहरी भागातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिकांना १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू केलेल्या पाणीकपातीत वाढ करण्यात येणार नाही. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे